वाडेगाव येथील नदीपात्रात असलेला कोल्हापूरी बंधारा सध्या ओसंडून वाहत असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे आणि वरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहामुळे जलसाठा भरपूर प्रमाणात आहे.
Related News
ठाणे-कल्याणमध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;
बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची पाकिस्तानातून सुरक्षित वापसी
कान्समध्ये उर्फी जावेदचा डेब्यू उधळला;
शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;
“अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे…
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करावं की विकावं
अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,
शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी परदेश यात्रा रद्द;
“सीजेआय पदाची शपथ घेण्याआधी आईचं आशीर्वाद घेतलं”
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
याचा लाभ परिसरातील सिंचन विहिरींना व कूपनलिकांना होत असल्याने बागायती क्षेत्रासाठीही हा पाणीपुरवठा फायदेशीर ठरत आहे.
बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होत असल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. जलसाठा शंभर टक्के
भरल्याने सध्या बंधारा ओसंडून वाहत आहे, आणि त्यामुळे परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होत आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तींनी काढल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ५०% खाली आली होती.
मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे गेट पुन्हा लावण्यात आले आणि सध्याच्या परिस्थितीत बंधाऱ्यात पाणी पूर्ण क्षमतेने साठवले गेले आहे.
वाडेगाव आणि आसपासच्या गावांमध्ये बंधाऱ्याचा जलसाठा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
त्यामुळे या बंधाऱ्याच्या योग्य देखभालीसाठी स्थानिक प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shri-rishi-maharaj-yatra-mahotsav-at-patur-nandapur-13-january-2025/