अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील
शेरवाडी गावातील ३२ वर्षीय युवा शेतकरी विवेक बाबाराव ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
गेल्या महिन्यात जिल्ह्यात सहा, तर फक्त मूर्तिजापूर मतदारसंघातच चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
Related News
राजकारण्यांवरही कारवाईचा इशारा! Devendra Fadnavis यांचे विधानसभेत मोठे विधान; Ashok Kharat प्रकरणाला नवे वळण
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या Ashok...
Continue reading
‘मरणाने केली सुटका…’ १३ वर्षांच्या कोम्यानंतर Harish Rana यांचे निधन; भारतातील दयामरणाचा ऐतिहासिक क्षण
भारताच्या वैद्यकीय आणि न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक अत्यंत संवेदनशील आणि मह...
Continue reading
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांचा Donald Trump यांना थेट फोन; भारताची भूमिका स्पष्ट
अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
नागपुरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
नागपुर येथे अंडी आणि चिकनप्रेमींसाठी धोक्याची घंटा वाजवणारी गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील से...
Continue reading
८ महिलांचे ३५ धक्कादायक चित्रफिती; जवळच्या व्यक्तीनेच उघड केला भोंदू Ashok Kharat चा काळा चेहरा!
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
20 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर झेपावला; ब्लू क्लाउड सॉफ्टटेकला सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर
शेअर बाजारात नेहमीच कमी किमतीचे पेनी स्टॉक्स गुंतवणूक...
Continue reading
नाशिक प्रकरणात नवे वळण : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून ट्रस्ट सदस्यांची चौकशी
नाशिकमधील भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
प्रियांका चोप्राने मिलानमध्ये Bvlgari इव्हेंटमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं; अॅन हॅथवे आणि दुआ लिपासोबत रेड कार्पेटवर ग्लॅमरचा जलवा
प्रियांका चोप्रा नेहमीच ग्लोबल फॅशन इंडस्ट्रीमध्ये त...
Continue reading
गर्मीमध्ये डेहायड्रेशन टाळा: आपल्या शरीराचे 5 संकेत आणि त्यावर त्वरित उपाय
उन्हाळा आला की अनेक लोकांसाठी डेहायड्रेशन (पाणी कमी होणे)
Continue reading
शांत नातेसंबंध बोरिंग का वाटतात? खरी प्रेमाची ओळख कशी करावी
आजकाल अनेक लोकांच्या नातेसंबंधांमध्ये एक वेगळीच समस्या दिसून येते – जेव्हा ते शांत, स्थिर आणि आरोग्यपूर्ण नातेसंबंधात अ...
Continue reading
Airtel चा सस्ता 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन: महागड्या रिचार्जपासून मुक्तता, ग्राहकांसाठी मोठी बातमी
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल होत आहेत आणि Airtel
Continue reading
CTC, Gross Salary आणि In-Hand Salary मध्ये काय फरक आहे? – सुलभ भाषेत समजून घ्या
नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी Salary Structure समजून घ...
Continue reading
कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्य
विवेक ढाकरे हे वडिलोपार्जित ११ एकर शेती कसत होते. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते,
त्यामुळे संपूर्ण शेती व घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती. आईसोबत राहत असलेल्या विवेक यांना शेतीच्या
खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा भार होता. सततच्या नापिकी, वाढती महागाई,
आणि पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक तंगीने त्रस्त
असलेल्या विवेक यांनी शेवटी टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येचा प्रयत्न आणि मृत्यू
२६ मार्च रोजी नैराश्यातून त्यांनी घरातच कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी
तातडीने त्यांना मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबावर संकट – आता आईचे काय?
विवेक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या तीन बहिणींचे लग्न झाले असून,
कुटुंबात कमावणारा दुसरा कोणीच नाही. एका कर्त्या युवकाच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली असून,
शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजना आवश्यक
अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. कर्जमाफी,
शेतीला हमीभाव आणि पीकविमा यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन ठोस निर्णय घेतले नाहीत,
तर असे दुर्दैवी प्रसंग वारंवार घडत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.