अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील
शेरवाडी गावातील ३२ वर्षीय युवा शेतकरी विवेक बाबाराव ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
गेल्या महिन्यात जिल्ह्यात सहा, तर फक्त मूर्तिजापूर मतदारसंघातच चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्य
विवेक ढाकरे हे वडिलोपार्जित ११ एकर शेती कसत होते. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते,
त्यामुळे संपूर्ण शेती व घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती. आईसोबत राहत असलेल्या विवेक यांना शेतीच्या
खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा भार होता. सततच्या नापिकी, वाढती महागाई,
आणि पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक तंगीने त्रस्त
असलेल्या विवेक यांनी शेवटी टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येचा प्रयत्न आणि मृत्यू
२६ मार्च रोजी नैराश्यातून त्यांनी घरातच कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी
तातडीने त्यांना मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबावर संकट – आता आईचे काय?
विवेक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या तीन बहिणींचे लग्न झाले असून,
कुटुंबात कमावणारा दुसरा कोणीच नाही. एका कर्त्या युवकाच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली असून,
शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजना आवश्यक
अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. कर्जमाफी,
शेतीला हमीभाव आणि पीकविमा यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन ठोस निर्णय घेतले नाहीत,
तर असे दुर्दैवी प्रसंग वारंवार घडत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.