नाशिक : महायुतीच्या जागावाटपात नाशिकचा पेच कायम असताना भाजपच्या दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ फार्मवर दोन्ही नेत्यांची भेट घेतली. दिंडोरीत सहकार्य करण्याचं आवाहन पवारांनी भुजबळांना केल्याचं समजतं. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे दिंडोरीत लक्ष घालण्याची विनंती पवारांनी भुजबळांकडे केली.
गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील लाल कांद्याला मात्र निर्यातबंदी केली. त्यामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी संतापले. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. कांदा पिकूनही सरकारच्या धोरणांमुळे शतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली. विरोधकांनीदेखील हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे मग केंद्रानं बांगलादेश, श्रीलंकेसह सहा देशांना ९९ हजार १५० टन कायदा निर्यातीची परवानगी दिली. शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. पण ही घोषणा जुनीच असल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. सरकारनं मात्र हा निर्णय नवीन असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला.
भारती पवारांची अडचण काय?
दिंडोरीत विधानसभेच्या सहा जागा येतात. नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी या सहाही मतदारसंघात कांदा पिकतो. कांदा हीच या मतदारसंघाची ओळख आहे. हेच इथलं प्रमुख पीक आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात रोष आहे. शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. याचा फटका भारती पवारांना बसू शकतो. भारती पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे मैदानात आहेत. प्रत्येक भाषणात ते कांदा प्रश्नाचा उल्लेख करतात. त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे भारती पवारांची धाकधूक वाढली आहे.
Related News
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची
धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता
मंत्रालयातील मुख्यम...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले ...
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
पुण्यात गजानन मारणेच्या गुंडांनी एका मिरवणुकीदरम्यान
भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केली होती.
पुण्यात आल्यावर या कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घे...
Continue reading
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झे...
Continue reading
शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’,
असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला.
तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली....
Continue reading
आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस
गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार,
बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच स...
Continue reading
संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.
आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत,
ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत.
दुसरं काही नाही. आमच्या हातात फक्...
Continue reading
Raosaheb Danve BJP : भाजपचे रावसाहेब दानवे म्हणजे एकदम रांगडी व्यक्तिमत्व.
जे मनात आले ते कोणताही मुलाहिजा न ठेवता बोलून मोकळं व्हायचं, असा त्यांचा स्वभाव,
पण याचमुळे ते अनेक...
Continue reading
"थुंका ना मग. जनता तुमच्यावर थुंकली म्हणून तुम्ही लोकसभेला वाहून गेलात.
विधानसभेला पाप करुन निवडून आलात. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना शिव्या घालतात.
तुमचा पक्ष मोठा नसून छोटा आहे. ...
Continue reading
पवारांच्या मागे भुजबळांचं बळ?
केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. स्थानिक खासदार भारती पवार केंद्रात मंत्री असूनही त्यांना हा प्रश्न सोडवता न आल्यानं शेतकऱ्यांचा रोष जास्त आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारती पवारांनी आज भुजबळांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नाशिकचे पालकमंत्री राहिलेल्या भुजबळांचं जिल्ह्यावर चांगलं वर्चस्व आहे. ते राज्यात मंत्री आहेत. वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यास शेतकऱ्यांचा रोष कमी होईल अशी आशा पवार यांना आहे.