प्रतिनिधी :-राहुल गावंडे
कामरगाव :- शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून
शेतकरी बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याची ओढ शेतकऱ्यांनी लागली असल्याचे दिसुन येत आहे.
Related News
महावितरण चा गजब कारभार खाली पडलेल्या चालू विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन श्वान मृत्युमुखी
वारीसाठी मध्य रेल्वेची तयारी; ८० विशेष गाड्यांची सोय, कर्नाटकहूनही रेल्वे
सोयाबीनपेक्षा कपाशीला पसंती दहिगाव गावंडे येथे पेरणीला वेग : शेतशिवारात लगबग
एअर इंडिया विमान दुर्घटनेत तरुण क्रिकेटपटू दीर्ध पटेलचा मृत्यू; इंग्लंडला जात असताना अपघात
कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; नागपूरात आपत्कालीन लँडिंग
भेंडीमहाल ते पिंजर रस्त्यावर खड्डे! अपघाताची शक्यता
उंबर्डा बाजार परिसरात कपाशीच्या लागवडीला सुरुवात
विराट कोहलीचं मॅचदरम्यान ‘स्पेशल चॉकलेट’; किंमत तब्बल ५ हजार रुपये!
नाशिकमध्ये उद्धव सेनेला आणखी एक हादरा; चार माजी नगरसेवक शिंदे गटात
वाई फाट्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक,एक जागीच ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत माकडाचे दुर्दैवी निधन
विनंती अर्ज देऊनही मोखा ग्रामपंचायत चा कारभार नियोजन शून्य
कामरगाव परिसरात ही मागील काही दिवसापासून मेघगर्जनीसह पाऊसांचे आगमन झाले असल्याने शेतकरी राजा आनंदात दिसत आहे.
यावर्षी कामरगाव परिसरात शेतकऱ्यांचा कपाशी लागवणीकडे कल वाढला आहे.
असे असताना मात्र बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून बी बियाणे व
रासायनिक खताचा तुटवळा भासवून ज्यादादरांने शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खताची विक्री करून शेतकऱ्याची एक प्रकारे सर्रास लूट सुरू आहे.
कपाशी बियाणे अजित 155 व अजित 5 या या बियाण्याची दाम दुप्पट करून विक्री होत आहे.
तर काही कृषी सेवा केंद्र चालकाकडून कपाशी बियाण्याचे व रासायनिक खताचे कमी पैशाचे दुकानाचे बिल
शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांकडून दाम दुप्पट पैसे वसूल करत असल्याची माहिती समोर येत आहे.
तर काही कृषी चालकाकडून दुसऱ्या राज्यातून निष्कृष्ट दर्जाचे शाश्वती नसलेल्या बियाण्याने खरेदी
करून ते जवळच्या नातेवाईक यांच्या घरी ठेवून शेतकऱ्याची दिशाभूल करून विक्री करत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
त्या मुळे शेतकऱ्याची मोठी फसवणूक होत आहे.
तरीही कृषी विभागाकडून कामरगाव येतील कृषी केंद्र चालकावर कारवाई होत नसल्याने
दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे कृषी विभागाचा वचक कृषी सेवा चालकांवर नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bulfle-2/