मुंबई : लोकेश राहुलची भारताच्या टी-२० संघात एंट्री होईल, अशी आशा सर्वांनाच होती. कारण यष्टीरक्षण आणि सलामीची जबाबदारी राहुल हा नेहमीच पार पाडतो. त्याचडबरोबर राहुलकडे क्रिकेटचा चांगला अनुभवही आहे. पण तरीही त्याची भारताच्या टी-२० वर्ल्ड कपच्या संघात निवड झाली नाही. पण राहुलची भारतीय संघात का निवड झाली नाही, याचे खरे कारण आता निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे.
राहुलने भारताचे कर्णधारपदही भूषवले आहे. भारतीय संघासाठी राहुल एक महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे भारताच्या संघात त्याला नेहमीच संधी दिली जाते. पण यावेळी मात्र जेव्हा टी-२० वर्ल्ड कपचा संघ निवडला गेला, तेव्हा त्याला मात्र संधी मिळाली नाही. हा चाहत्यांसाठीही एक धक्का होता. पण राहुलची फक्त एका कारणामुळेच भारताच्या टी-२० संघात का निवड करण्यात आली नाही, असे आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
राहुलबाबत आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, ” लोकेश राहुल हा एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या गुणवत्तेबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. आयपीएलमध्ये तो सलामीला येऊन फलंदाजी करत आहे. ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याचबरोबर संजू सॅमसन हा मधल्या फळीत कोणत्याही स्थानावर येऊन फलंदाजी करू शकतो. आम्हाला मधल्या फळीत येऊन फलंदाजी करणारा खेळाडू हवा होता. निवड करताना आम्ही खेळाडूंच्या स्थानाबद्दलही विचार केला. त्यामुळेच आम्ही लोकेश राहुलची निवड करू शकलो नाही, हे एकमेव कारण आहे. पण राहुल हा एक दमदार खेळाडू आहे, याबद्दल आमच्या कोणाचेही दुमत नव्हते.”
Related News
Virat Kohli ICC ODI Ranking मध्ये दहा दिवसांत मोठा बदल; भारतविरुद्ध मालिका गमावल्यावर डॅरिल मिशेलने विराट कोहलीचा अव्वल स्थानावरून ...
Continue reading
मुंबईतील चाहत्याने Hardik पांड्याच्या कडून अपेक्षित मर्यादा ओलांडल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये हार्दिकचा संयमी प्रतिसाद पाहा आणि सोशल मीडियेत चर्चा कशी वाढली ते जाणून घ्या.
मुंबईत नु...
Continue reading
Rohit Sharma Emotional Video पाहून क्रिकेटप्रेमींना भावनिक धक्का! मुलगी समायराच्या शाळेच्या कार्यक्रमात रोहित शर्माचे अश्रू अनावर ...
Continue reading
Mohammed Shami अद्याप टीम इंडियात का नाही? जाणून घ्या माजी कर्णधार सौरव गांगुली आणि निवड समितीचे दृष्टिकोन, शमीची शानदार कामगिरी, आणि आगामी क्रि...
Continue reading
मास्टर ब्लास्टरच्या मुलाने क्रिकेटमध्ये केला जबरदस्त जलवा
क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे नाव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सचिनने आपल्या का...
Continue reading
टी20 स्पर्धेसाठी मुंबई संघातील सूर्यकुमार यादवची भूमिका ठरली; कर्णधारपद शार्दुल ठाकुरच्या खांद्यावर
सद्यस्थितीत भारतीय क्रिकेटमधील टी20 फॉर्मेटची महत्त्वाची
Continue reading
सचिन तेंडुलकरवर श्री सत्य साईबाबांची कृपादृष्टी! २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मिळालेला आत्मविश्वास आणि अनुभव
भारताचा मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींना प...
Continue reading
शुभमन गिल आणि Gautam गंभीर यांच्यात मतभेद; भारतीय संघाला गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा फटका
Gautam गंभीर हा भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा खेळाडू आणि संघाच...
Continue reading
IPL Trade 2026: खेळाडूंच्या मोठ्या बदलांमध्ये अर्जुन तेंडुलकरचा MI सोडून LSG कडे प्रवेश
IPL 2026 साठी मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग झाले असून काही प्रमुख खेळा...
Continue reading
KL राहुल विक्रमाच्या उंबरठ्यावर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत ठरणार मोठा टप्पा
भारतीय cricket संघातील विश्वासार्ह फलंदाज के.एल. राहुल (KL Rahu...
Continue reading
आयपीएल 2026 ट्रेड विंडोमध्ये अर्जुन तेंडुलकरसाठी लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्समध्ये महत्त्वपूर्ण डीलची चर्चा सुरु. शार्दुल ठाकुर आणि अ...
Continue reading
Abhishek Sharmaयांचा विश्वविक्रम! ऑस्ट्रेलियन ताऱ्याला मागे टाकत इतिहास रचला; टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा सर्वात जलद गतीने करणारा खेळाडू ठरला
ब्रिस्बेन (गब्बा) : भारतीय युवा क्रि...
Continue reading
लोकेश राहुल हा भारताचा भविष्यातील कर्णधार असल्याचे म्हटले जात होते. पण यावेळी तर टी-२० वर्ल्ड कपच्या संघातच त्याला संधी मिळालेली नाही. त्यामुळे यापुढेही तो भारताच्या टी-२० संघात नसेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे यापुढे राहुल हा फक्त भारताच्या कसोटी आणि वनडे संघातच पाहायला मिळू शकतो.
सध्या राहुल लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. पण या आयपीएलमध्ये त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही.