मुंबई : लोकेश राहुलची भारताच्या टी-२० संघात एंट्री होईल, अशी आशा सर्वांनाच होती. कारण यष्टीरक्षण आणि सलामीची जबाबदारी राहुल हा नेहमीच पार पाडतो. त्याचडबरोबर राहुलकडे क्रिकेटचा चांगला अनुभवही आहे. पण तरीही त्याची भारताच्या टी-२० वर्ल्ड कपच्या संघात निवड झाली नाही. पण राहुलची भारतीय संघात का निवड झाली नाही, याचे खरे कारण आता निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे.
राहुलने भारताचे कर्णधारपदही भूषवले आहे. भारतीय संघासाठी राहुल एक महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे भारताच्या संघात त्याला नेहमीच संधी दिली जाते. पण यावेळी मात्र जेव्हा टी-२० वर्ल्ड कपचा संघ निवडला गेला, तेव्हा त्याला मात्र संधी मिळाली नाही. हा चाहत्यांसाठीही एक धक्का होता. पण राहुलची फक्त एका कारणामुळेच भारताच्या टी-२० संघात का निवड करण्यात आली नाही, असे आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
राहुलबाबत आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, ” लोकेश राहुल हा एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या गुणवत्तेबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. आयपीएलमध्ये तो सलामीला येऊन फलंदाजी करत आहे. ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याचबरोबर संजू सॅमसन हा मधल्या फळीत कोणत्याही स्थानावर येऊन फलंदाजी करू शकतो. आम्हाला मधल्या फळीत येऊन फलंदाजी करणारा खेळाडू हवा होता. निवड करताना आम्ही खेळाडूंच्या स्थानाबद्दलही विचार केला. त्यामुळेच आम्ही लोकेश राहुलची निवड करू शकलो नाही, हे एकमेव कारण आहे. पण राहुल हा एक दमदार खेळाडू आहे, याबद्दल आमच्या कोणाचेही दुमत नव्हते.”
Related News
आरसीबी vs सीएसके : चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, विराट किती धावा करणार?
IPLच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या डबल हेडरमध्ये रविवारी, 5 एप्रिलला रॉयल चॅलें...
Continue reading
IPL 2026: ऋषभ पंत खरंच सलामीवीर आहे का? लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
IPL 2026 चा सीझन सुरू झाला असून लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी पहिल्...
Continue reading
आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील चौथ्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटचा चर्चित गोलंदाज मोहम्मद शमी यांनी क्रिके...
Continue reading
विराट कोहली-अनुष्का शर्मा: आईपीएल 2026 मध्ये ‘रोमँटिक कपल’चे फुलझाड; फ्लायिंग किस आणि फॅन्सचे उत्साह
आयपीएल (IPL) 2026 च्या 19व्या सिझनच्या ओपनिंग मॅचमध्ये बेंगळुरूच्या
Continue reading
टी-20 वर्ल्ड कप फायनल 2026 मध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने! डेल स्टेनने भारताच्या विजयी भविष्यवाणी केली; जाणून घ्या फायनल सामन्याच्या तयारी...
Continue reading
मुंबई: वर्ल्ड कप टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारत आणि न्यूझीलंडचा सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडवर मात के...
Continue reading
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंदोकचं विवाहसंस्कार: पारंपरिक लाल रंगातील समन्वित देखणे असेतं जोडीचं शैली विधान
क्रिकेटचे लीजेंड साचि...
Continue reading
IND vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनलमध्ये भारताचा संघ इंग्लंडविरोधात कसा चमकणार? सौरव गांगुलीच्या टिप्स, संजू सॅमसनच्या शानदा...
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
Suryakumar Yadav दक्षिण आफ्रिकेविरोधातील T20 सामन्यानंतर नाराज झाला; 76 धावांनी पराभव, भारताला पुढील झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज सामन्यांसाठी रणन...
Continue reading
“IND vs SA 2026 सामन्यात भारताचा पराभव; विराट कोहलीच्या अभूतपूर्व कामगिरीची आठवण येते. जाणून घ्या इतिहासातील फक्त 3 वेळा भारताने 150+ धावांचा पा...
Continue reading
Virat Kohli ICC ODI Ranking मध्ये दहा दिवसांत मोठा बदल; भारतविरुद्ध मालिका गमावल्यावर डॅरिल मिशेलने विराट कोहलीचा अव्वल स्थानावरून ...
Continue reading
लोकेश राहुल हा भारताचा भविष्यातील कर्णधार असल्याचे म्हटले जात होते. पण यावेळी तर टी-२० वर्ल्ड कपच्या संघातच त्याला संधी मिळालेली नाही. त्यामुळे यापुढेही तो भारताच्या टी-२० संघात नसेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे यापुढे राहुल हा फक्त भारताच्या कसोटी आणि वनडे संघातच पाहायला मिळू शकतो.
सध्या राहुल लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. पण या आयपीएलमध्ये त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही.