कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यालयीन वेळेत
अनेक विभागांतील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कक्षात गैरहजर असल्याचे सोमवारी (ता. ७) पाहायला मिळाले.
या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे.
ग्रामविकासाच्या योजनांवर परिणाम
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचलाऊ व निष्काळजी भूमिकेमुळे
अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी अडथळ्यांमध्ये सापडली आहे.
सीईओ बदलीनंतर पुन्हा शिथिलता
माजी सीईओ बी. वैष्णवी यांनी अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
मात्र त्यांची अलीकडेच नागपूर महापालिकेत बदली झाल्यापासून, अनेक ‘दांडीबहाद्दर’ कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.
‘टपरी’चे कर्मचारी!
काही कर्मचारी बायोमेट्रिक हजेरीनंतर कार्यालयात थांबतच नाहीत,
तर जिल्हा परिषद आवारात भटकंती करताना, चहा टपरी, पानपट्टीवर थांबलेले दिसतात.
त्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.
साहेब गेलेत, थोड्याच वेळात येतील…
गैरहजर कर्मचाऱ्यांविषयी विचारल्यावर “साहेब आत्ताच बाहेर गेलेत”, “जिल्हाधिकारी कार्यालयात काम आहे”,
अशा बनवाबनवी कारणांची सरबत्ती केली जाते. त्यांचे सहकारीदेखील बेशिस्त वागणुकीवर पांघरूण घालतात.
विजेचा देखील अपव्यय
कार्यालय रिकामे असताना लाईट्स व पंखे सुरू ठेवून विजेचा अपव्यय होत असल्याचेही पाहायला मिळाले.
याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
नागरिकांमध्ये संताप
सरकारी कार्यालयात वेळेवर काम न झाल्याने सामान्य जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागत असून,
अशा बेजबाबदार कारभारामुळे जिल्हा परिषद प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.