माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात दाखल
झालेले बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोई
गँगने ही हत्या केल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणातील काही आरोपींची
धरपकड केली आहे. त्यात संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे
जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा
आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल
झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे.
थोड्या वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान
सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची तो भेट घेणार आहे. तर त्याचवेळी कुडाळ
विधानसभा मतदारसंघाच्या दाव्यासाठी राणे सुद्धा सागर बंगल्यावर
दाखल झाले आहेत. आताच्या वृत्तानुसार, अजितदादा पवार, प्रफुल्ल
पटेल हे पण फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या
सर्वच प्रकरणासह वेगवान राजकीय घडामोड घडताना दिसत आहे.
झिशान सिद्दीकी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीत, बाबा
सिद्दीकी यांच्या हत्येसंबंधीच्या तपासाची इत्यंभूत माहिती देण्यात
आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची धागेदोर कुठंपर्यंत आहेत,
याविषयी उहापोह झाल्याचे समजते. दरम्यान झिशान यांनी याप्रकरणात
न्याय देण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानचे
जवळचे मित्र असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई
गँगशी संबंधित काही जणांनी समाज माध्यमांवर केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pavarans-trasala-koodhun-bjp-sodatoy-maji-ministers-announcement/