जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून,
पुलवामा आणि त्राल भागात एकूण 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
गुरुवारी पुलवामात 3 दहशतवादी ठार करण्यात आले, तर आज त्रालच्या नादेर गावात
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 3 दहशतवादी – आसिफ अहमद शेख,
आमिर नझीर वाणी आणि यावर अहमद भट ठार झाले.
ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून,
या हल्ल्याचा संबंध या दहशतवाद्यांशी आहे का, याची चौकशी सुरू आहे.
गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी त्रालमधील नादेर गावाला वेढा घालून कारवाई केली.
दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
ही मोहिम अद्याप सुरू असून दहशतवाद्यांना शोधून ठार करण्याची रणनीती सुरक्षा दलांनी
अवलंबली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून,
जम्मू-कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhajinagamadhyay-darodakhoracha-kahr/