कुरणखेड: राष्ट्रीय महामार्ग 53 वरील दाळंबी येथील वत्सल्यधाम वृद्धाश्रमात जैन साधुसंतांच्या
पावन उपस्थितीने वातावरण भक्तिमय झाले आहे. नागपूर येथून पुढील प्रवासासाठी निघालेल्या जैन
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य मुनीश्री अर्हत् कुमारजी, मुनीश्री भरत कुमारजी,
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
आणि मुनीश्री जयदीप कुमारजी यांनी वृद्धाश्रमात मुक्काम केला.
मुनीश्रींनी सत्संगाच्या माध्यमातून उपस्थितांना जीवनाचे खरे उद्दिष्ट समजावले.
“मनुष्य जीवन हे जप, तप, भक्ती, आणि साधनेने अधिक पवित्र होते. मांसाहार, मद्यपान
यासारख्या गोष्टींना दूर ठेऊन आपले जीवन भक्तीमय करा,” असे त्यांनी सांगितले.
वृद्धाश्रमाचे संचालक रवी राठी यांनी जैन साधुसंतांसाठी नेहमीच आश्रमात मुक्कामाची व्यवस्था केली असल्याचे नमूद केले.
येथे हिंदू व जैन धर्मातील अनेक साधुसंतांचे आगमन होत असते, ज्यामुळे वत्सल्यधाम आध्यात्मिकतेने पावन झाले आहे.
सत्संग प्रसंगी आश्रमाचे संचालक रवी राठी, व्यवस्थापक योगेश विजयकर यांच्यासह अकोल्याहून आलेले प्रविण सेठिया,
प्रकाश गधैया, नवलचंद कोचेटा यांसारखे भाविक उपस्थित होते.
जैन मुनींच्या प्रवचनाने वृद्धाश्रमातील रहिवासी व भक्तांना नवीन प्रेरणा मिळाली.
उपस्थितांनी या सत्संगातून मिळालेल्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला.
वृद्धाश्रमातील अशा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे वृद्धांना मानसिक आधार व शांती मिळते, असे मत भाविकांनी व्यक्त केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/appeal-for-help-for-somnath-suryavanshis-family-state-governments-help-rejected/