बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत,
त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यात नायट्रेटचा उच्च प्रमाण आढळला आहे, जो केसगळतीचे एक कारण असू शकतो.
देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच
Related News
अजित पवार गटात अंतर्गत कलह? ‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’ चर्चेने राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Continue reading
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आसामी पाककृती; ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ उष्णतेपासून देतील आराम
उन्हाळा सुरू झाला की भारतभर थंडावा देणाऱ्या पदार्थांची चर्चा रंगते. कुठे आंब्याचे प...
Continue reading
‘Karuppu’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; सूर्या-त्रिशाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 20 कोटींचा टप्पा पार
दक्षिण भारतीय सुपरस्टार Suriya आणि अभिनेत्री
Continue reading
Cafe मधील कोल्ड कॉफी इतकी क्रीमी का लागते? घरच्या कोल्ड कॉफीला परफेक्ट कॅफे स्टाइल टेस्ट देण्यासाठी जाणून घ्या खास ट्रिक्स
Cafe मधील कोल्ड कॉफी इतकी क्री...
Continue reading
उन्हाळ्यात फरमेंटेड भात का ठरतो सुपरफूड? आजीच्या पारंपरिक उपायामागील विज्ञान जाणून घ्या
उन्हाळ्यात फरमेंटेड भात का ठरतो सुपरफूड : भारतीय घरांमध्ये उन्हाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी...
Continue reading
आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत.
त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे.
त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार आहे? ही भानामती आहे की वेगळाच काही व्हायरस आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे.
या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती आली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड
येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे.
त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे. परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.