अकोला | प्रतिनिधी
राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कलश यात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली
Related News
आणि विविध किल्ल्यांची व पवित्र नद्यांची माती जलकलशात एकत्र करून विसर्जित केली.
पर्यावरण रक्षणासाठी मोठे पाऊल
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यातील उद्योगांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी
हे पर्यावरणासाठी घातक ठरत असून, लवकरच कडक नियम अमलात आणण्यात येणार आहेत.
कलश यात्रेतून सामाजिक संदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील किल्ल्यांची आणि नद्यांची माती एकत्र करून संवेदनशीलता
आणि एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. मंत्री नाईक यांनीही या उपक्रमात सहभाग घेत महाआरती केली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
उद्योगांतील प्रदूषण नियंत्रणासाठी लवकरच येणाऱ्या नियमांमुळे संपूर्ण राज्यात पर्यावरणीय शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा मंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/st-basamadhila-pravashanchaya-surakshecha-question/
