भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षात म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता इंदापुरातून
मोठी बातमी समोर येत आहे. हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून
Related News
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
इंदापुरातून उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांनी शरद पवार गटात
प्रवेश केलाय. पण हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने
इंदापुरातील शरद पवार गटाचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. या
नेत्यांनी आज इंदापुरात भव्य मेळावा घेत प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं.
यावेळी शरद पवार गटाचे नेते तथा सोनई ग्रुप संस्थापक दशरथ माने
यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना मोठा इशारा दिला. हर्षवर्धन पाटील
यांना इंदापुरातून उमेदवारीचा निर्णय शरद पवारांनी बदलला नाही तर
भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापुरात होईल, असा मोठा इशारा
दशरथ माने यांनी दिला आहे. “माझ्या राजकीय 35 वर्षाच्या कारकिर्दीत
एवढी मोठी सभा पहिल्यांदाचं बघितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला
देखील एवढे नागरिक जमत नाहीत. खासदार सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या
इंदापूरला महिला जमत नाहीत. जरा हे महिलांचं मोहोळ बघा. हे
(हर्षवर्धन पाटील) पक्षात शिरले. आमच्या शरद पवारांचा तंबूच घेऊन गेले,
पण इथे बांबू आहेत ना. अजूनही विनंती आहे. ही गर्दी पाहा आणि निर्णय
बदला. निर्णय बदलला नाही तर भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी या
इंदापुरात झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पेक्षा मोठा पॅटर्न इंदापूरमध्ये
दिसणार. आम्ही एकत्र बसू आणि अपक्ष उमेदवार देऊ”, असा मोठा इशारा
सोनई ग्रुपचे संस्थापक दशरथ माने यांनी दिला. शरद पवार गटाचे नेते प्रविण
माने यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “पूर्ण इंदापुरामध्ये आज ऐतिहासिक सभा
झाली. याआधी कधीच एवढी मोठी सभा झालेली नाही. जनतेचा प्रचंड प्रतिसाद
होता. जेव्हा असा प्रतिसाद असतो तेव्हा एक वेगळा साऊंड असतो. तो लोकसभा
निवडणुकीत आपण पाहिलेला आहे. आज लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा
आहे. आव्हानानंतर तीन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता या ठिकाणी
आली आणि जनतेने आपला कौल दिलेला आहे. सुप्रिया सुळे ताई आणि शरद
पवार आम्हाला कालही दैवत होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत.
आजच्या जनतेचा प्रतिसाद बघून निर्णय नाही बदलला तर अपक्ष ही भूमिका
राहील. जनतेचा प्रतिसाद आहे तो नाकारू शकत नाही”, अशी भूमिका प्रविण
माने यांनी मांडली.
Read also: https://ajinkyabharat.com/all-ambedkarite-leaders-gathered-together-athavlanchi-ambedkarana-saad/