टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी मालिका खेळायची आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे.
मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.
पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा
यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
त्यांना संजू सॅमसन, शिवम दुवे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.
सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी २० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याने भारतीय संघ तिथेच अडकला आहे.
त्यामुळे सॅमसन, जैस्वाल आणि दुबेही भारतीय संघाबरोबर बार्बाडोसमध्ये आहेत.
ते आता आधी भारतात येतील आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी सामन्यांसाठी
रवाना होतील.
दरम्यान, यामुळे आता साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांना
आंतरराष्ट्रीय टी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी असणार आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षित राणावर आयपीएल २०२४ दरम्यान
बीसीसीआयने शिस्तभंगाबद्दल कठोर कारवाई केली होती.
त्याला एका सामन्यासाठी बंदीही घातली होती.