टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी मालिका खेळायची आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे.
मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.
पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा
यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
त्यांना संजू सॅमसन, शिवम दुवे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.
सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी २० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याने भारतीय संघ तिथेच अडकला आहे.
त्यामुळे सॅमसन, जैस्वाल आणि दुबेही भारतीय संघाबरोबर बार्बाडोसमध्ये आहेत.
ते आता आधी भारतात येतील आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी सामन्यांसाठी
रवाना होतील.
दरम्यान, यामुळे आता साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांना
आंतरराष्ट्रीय टी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी असणार आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षित राणावर आयपीएल २०२४ दरम्यान
बीसीसीआयने शिस्तभंगाबद्दल कठोर कारवाई केली होती.
त्याला एका सामन्यासाठी बंदीही घातली होती.