खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर
भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत.
Related News
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
मंगळवारी (दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त
कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले.
यावरुन आता एका भारतीय वंशाच्या खासदाराने
कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली.
खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला
खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडियन विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली.
चंद्रा आर्य म्हणाले की, खलिस्तानी दहशतवादी भारताचेच नव्हे,
तर कॅनडाचेही नुकसान करत आहेत. यावेळी त्यांनी 1985 मध्ये
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झालेल्या स्फोटाची आठवण करून दिली.
तसेच, त्यांनी 23 जून रोजी 1985 च्या बॉम्बस्फोटातील बळींच्या स्मरणार्थ
एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे माहिती दिली
आणि सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
23 जून 2024 रोजी राजधानी ओटावा येथील
डाऊ लेकजवळील स्मारकाच्या ठिकाणी आणि
ओंटारियोमधील क्वीन्स पार्कमध्ये दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
चंद्रा संसदेत बोलताना म्हणाले की,
खलिस्तानी समर्थक देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत.
23 जून हा दहशतवादामुळे बळी पडलेल्यांचा स्मृतिदिन आहे.
39 वर्षांपूर्वी याच दिवशी एअर इंडियाचे विमान हवेत असताना उडवण्यात आले होते.
त्या घटनेत 329 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.
कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता,
ज्यात एकूण 268 कॅनेडियनही ठार झाले होते.
नुकतंच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,
यांच्या हत्येचा कॅनडाच्या संसदेत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावरुन देशात काळ्या शक्ती पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते, अशी टीकाही केली.
Read also: https://ajinkyabharat.com/because-of-the-central-governments-mischief-you-became-a-disgrace/