एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली
आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक
लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
संभाजीनगरमधून लढणार आहेत. इम्तियाज जलील म्हणाले,
नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. लोकांमध्ये
रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम
खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी
मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे. आमचे कार्यकर्ते
आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांची निवडणूक लढवण्याची
इच्छा आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात
जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर
काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. बी टीम आम्हाला
म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत.
आता आम्ही या आरोपांना काडीचंही महत्त्व देत नाहीत. आम्हाला
संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु?
आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार आहोत. आम्ही कसं
निवडून येऊ शकतो, हा विचार करणार आहोत.
काँग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार प्रतापराव
चिखलीकर यांचा पराभव करत नांदेड लोकसभेतून दिमाखदार
विजय मिळवला होता. अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते
भाजपसोबत असल्यामुळे नांदेडमध्ये झालेल्या भाजपचा पराभव
महाराष्ट्रभर चर्चेला गेला. दरम्यान, मोठा विजय मिळवल्यानंतर
खासदार वसंत चव्हाण यांचे तीन महिन्यानंतर निधन झाले. त्यामुळे
नांदेडमध्ये पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र
विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच नांदेडच्या लोकसभा
निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.