राजू शेट्टींची सरकारवर टीका – “महायुतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली”
मूर्तिजापूर (जि. अकोला): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे चौथे शेतकरी साहित्य
संमेलन आणि दहावे कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
या दोन दिवसीय कार्यक्रमात शेतीच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल मंथन होणार आहे.
या संमेलनाला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हजेरी लावली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांनी आरोप केला की, महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.
“महायुतीचे नेते ग्रामीण भागात फिरू शकणार नाहीत” – शेट्टी
राजू शेट्टी यांनी पुढे म्हटले की, “अजित पवार गेली अनेक वर्षे अर्थमंत्री होते, त्यांना अर्थव्यवस्थेची पुरेशी माहिती आहे.
तरीही त्यांनी असे आश्वासन का दिले?” त्यांनी महायुतीवर टीका करत म्हटले की,
“शेतकऱ्यांना गंडवून फक्त मतं मिळवण्याचा हा डाव आहे.
त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही ग्रामीण भागात फिरू देणार नाही.”
अजित पवारांवर ‘मोहम्मद तुघलक’ची उपमा
शेट्टी यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना “मोहम्मद तुघलकाचा शेवट कसा झाला,
हा इतिहास त्यांनी बघावा” असे म्हणत टीका केली.
तसेच, राज्यातील शेतकरी आत्महत्यांवरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, मात्र काही अंशी शेतकरी स्वतःही
सरकारच्या धोरणांना जबाबदार आहेत,” असेही शेट्टी यांनी नमूद केले.