राजू शेट्टींची सरकारवर टीका – “महायुतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली”
मूर्तिजापूर (जि. अकोला): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे चौथे शेतकरी साहित्य
संमेलन आणि दहावे कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
या दोन दिवसीय कार्यक्रमात शेतीच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल मंथन होणार आहे.
या संमेलनाला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हजेरी लावली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांनी आरोप केला की, महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.
“महायुतीचे नेते ग्रामीण भागात फिरू शकणार नाहीत” – शेट्टी
राजू शेट्टी यांनी पुढे म्हटले की, “अजित पवार गेली अनेक वर्षे अर्थमंत्री होते, त्यांना अर्थव्यवस्थेची पुरेशी माहिती आहे.
तरीही त्यांनी असे आश्वासन का दिले?” त्यांनी महायुतीवर टीका करत म्हटले की,
“शेतकऱ्यांना गंडवून फक्त मतं मिळवण्याचा हा डाव आहे.
त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही ग्रामीण भागात फिरू देणार नाही.”
अजित पवारांवर ‘मोहम्मद तुघलक’ची उपमा
शेट्टी यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना “मोहम्मद तुघलकाचा शेवट कसा झाला,
हा इतिहास त्यांनी बघावा” असे म्हणत टीका केली.
तसेच, राज्यातील शेतकरी आत्महत्यांवरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, मात्र काही अंशी शेतकरी स्वतःही
सरकारच्या धोरणांना जबाबदार आहेत,” असेही शेट्टी यांनी नमूद केले.