तालुक्यातील बेलखेड शिवारात अल्पभूधारक शेतकरी अशोक पुंडलिक धुमाळे यांच्या ऊसाच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. सर्वे क्रमांक ७९१ मधील या घटनेमुळे ऊसाचे मोठे क्षेत्र जळून खाक झाले असून सिंचनासाठी वापरली जाणारी बोरची केबल, स्प्रिंकलर पाईप व इतर साहित्य पूर्णतः नष्ट झाले आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील वीजपुरवठा लाईनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि कोरड्या उसाला आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. शेजारील शेतकऱ्यांनी धूर व ज्वाळा दिसताच तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून गेला होता.
शेतकरी अशोक धुमाळे यांनी सांगितले की, “या आगीत माझ्या अनेक महिन्यांच्या परिश्रमावर पाणी फिरले. ऊसासोबतच स्प्रिंकलर पाईप, केबल आणि इतर सिंचन साहित्य जळाले आहे. मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने तातडीने मदत द्यावी.” त्यांनी पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Related News
22 एप्रिल 2026: महाराष्ट्रात हाय अलर्ट! 15+ जिल्ह्यांत गारपीट व मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये आग, परिसरात प्रचंड घबराट
राज्यात हवामानाचा अचानक बदल: नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
शेत रस्त्याचे काम थातूरमातूर ; प्रशासन झोपेत ? मळसूर परिसरातील प्रकार; लाखो रुपयांच्या निधीवर प्रश्नचिन्ह
IMD Weather Update : धोकादायक इशारा! पुढील 24 तासांत 5 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा
बाळापूर तालुक्यात रोहीचा हैदोस ; अळोशी–कळोशी शिवारात ३ एकर गहू पीक उद्ध्वस्त
पुंडा गाव बनले प्रभारी कर्मचाऱ्यांचे ‘माहेरघर’; ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका प्रभारी – पोलिस पाटील, कोतवाल पदे रिक्त
सावकारी कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
घटनेची पाहणी करून प्रशांत डिक्कर यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली. “अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अशी आपत्ती मोठा धक्का असतो. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून त्वरित मदत जाहीर करावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना आधार मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांनीही विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप केला आहे. शेतातील वीजवाहिन्यांची नियमित तपासणी व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे बेलखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
