नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आणि जमिनीवरील संयुक्त कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात आले.
Related News
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
कृषी सहायकांचा एकदिवसीय काम बंद आंदोलन;
आता या धडाकेबाज कारवाईनंतर भारतीय लष्करातील एका जवानानं ऑपरेशन सिंदूरमागचं संपूर्ण चित्र उलगडलं आहे.
“पाकिस्ताननं गोळ्या झाडल्या, पण भारतानं स्फोट घडवले!”
या जवानाने सांगितलं,
“ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ बदला नव्हता, तर दहशतवादाच्या मुळावर घाव घालण्याची रणनीती होती.
आम्ही मनाने, बुद्धीने आणि रणनैतिक तयारीने सज्ज होतो.”
त्याने स्पष्ट केलं की, भारताचा उद्देश होता — दहशतवादी तळं, शस्त्रसाठा केंद्रं आणि घुसखोरीला चालना देणाऱ्या पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करणं.
जगापुढे पाकिस्तानची लाजिरवाणी अवस्था
या कारवाईनंतर पाकिस्तान जगाकडे मदतीसाठी हात पसरत असून,
भारतीय हल्ल्याच्या तीव्रतेमुळे त्यांना आजही धडकी भरली आहे.
जागतिक पातळीवर पाकिस्तानला अडचणीत आणण्याचं काम भारतानं यशस्वीरित्या पार पाडलं.
ऑपरेशन सिंदूर – एक धोरणात्मक पलटवार
भारतीय लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्ट्राईकमध्ये जमिनीवरील गुप्तचर माहिती,
एरियल टार्गेटिंग तंत्रज्ञान, आणि विशेष प्रशिक्षणप्राप्त पथकांचा वापर करण्यात आला.
“हे युद्ध नव्हतं, ही एका विचाराची लढाई होती — दहशतवादाच्या विरुद्ध,”
असं या जवानानं ठामपणे सांगितलं.
‘बघा व्हिडीओ’ — लष्कराच्या वीरांच्या तोंडून थरारक कथा
भारतीय लष्कराने या ऑपरेशनची काही दृश्यं आणि जवानांच्या प्रतिक्रिया व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केल्या आहेत.
यातून ऑपरेशन सिंदूरमागचा खरा थरार, धैर्य आणि देशभक्तीचं दर्शन होतं.
Read Also : https://ajinkyabharat.com/tarch-amhi-intervention-karanar-reform-waqf-crespectal-supreme-judge/