पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत.
Related News
इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझ...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या जवळच काल सायंकाळी
एक ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
संबंधित ट्रक एका खाजगी पाणी बॉटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचा अ...
Continue reading
या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
दोन दिवसापूर्वी वित्त विभागातूनही या योजनेला विरोध असल्याची चर्चा सुरू आहेत.
आता आमदार बच्चू कडू यांनीच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
” लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या,
यासाठी पैसे नसतील तर राज्यपाल यांच्या बंगल्याची जागा विका,
असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. दुधाला भाव द्या,
कामगाराला मजुरी द्या. चालकांसाठी चांगली योजना असली पाहिजे,
यासाठी पैसे नसतील मी त्यांना चांगला पर्याय देतो. त्यांनी राज्यपाल यांचा
४० एकरातील बंगला विकावा. त्याचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत पैसे येतील.
ते पैसे तिकडे वापरा. राज्यपाल यांना ४० एकर जागा कशाला हवी?
त्यांना नवीन तीन, चार मजली इमारत बांधून द्या, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.
योजना कष्टकऱ्यांसाठी पाहिजेत
योजना आणायला काही हरकत नाही, पण त्या योजना कोणासाठी आणाव्यात हे महत्वाचं आहे.
योजना कष्टकऱ्यांसाठी असायला पाहिजेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.
देशात श्रीमंतच अधिक श्रीमंत होत चालला आहे.
मुंबईत पारसींकडे महत्वाची ६ हजार एकर जमीन आहे.
इंग्रजांकडून त्यांनी बक्षिस म्हणून मिळवली. कष्ट करणाऱ्यांना वन बीएचके घर
भेटणे खूप मोठं झालं आहे. कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपलं पाहिजे.
सरकारला आम्ही शेतकऱ्यांचा वाटा बजेटमध्ये किती आहे हे विचारत आहे.
त्यांचा या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.
सध्या मोठी विषमता सुरू आहे. ही विषमता तोडली पाहिजे.
यासाठी आम्ही ९ ऑगस्टला संभाजीनगरला मोठ्या मोर्चाचे आयोजन करत आहोत,
असंही आमदार कडू म्हणाले. “आम्ही विधानसभेसाठी संघटन करत आहोत,
आता आमचे दोन ते तीन सदस्य आहेत. आता आम्ही २० ते २५ जागांसाठी तयारी करत आहोत.
आतापर्यंत आम्हाला अनेकांचे अर्ज आले आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले.
काँग्रेसनेही ज्या योजना आणल्या त्याच योजना आता महायुती सुद्धा आणत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/vice-presidents-anger-over-delhi-coaching-center-accident/