पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले.
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
जर दिलेल्या मुदतीत देयक देण्यात आले नाही, तर २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे आमरण उपोषण (अन्नत्याग) आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रवी दिगांबर सोनोने, शुभम राखोंडे, मोहन गाडगे,
मुस्ताईन बेग, संदिप टाले, भगवंत काळदाते, कैलासचंद्र पराते आदी शेतकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/