पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
जर दिलेल्या मुदतीत देयक देण्यात आले नाही, तर २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे आमरण उपोषण (अन्नत्याग) आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रवी दिगांबर सोनोने, शुभम राखोंडे, मोहन गाडगे,
मुस्ताईन बेग, संदिप टाले, भगवंत काळदाते, कैलासचंद्र पराते आदी शेतकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/