अकोल्यातील अकोट आणि ठाण्यातील अंबरनाथ येथे सत्तेसाठी भाजपने काँग्रेस व एमआयएमसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कट्टर विरोधकांसोबत स्थानिक पातळीवर युती केल्याने भाजपवर तीव्र टीका होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“भाजपची काँग्रेस किंवा एमआयएमसोबत युती कधीच होऊ शकत नाही. हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पक्षाच्या विचारधारेविरोधात जाणाऱ्यांवर १०० टक्के कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
अकोटमध्ये ‘अकोट विकास मंच’ आणि एमआयएमचा सहभाग
अकोट नगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला. मात्र, या मंचामध्ये ओवेसींच्या एमआयएम पक्षाचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Related News
मुंबई : राज्यातील राजकारणात कायम चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या परदेश दौऱ्याचं कौ...
Continue reading
भाजपचे आमदार Gopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते Jayant Patil यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका करत राज्याच्या राजका...
Continue reading
वरळी आंदोलन गिरीश महाजन महिला वाद प्रकरणात आंदोलनावेळी घडलेल्या तणावपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा. महिला, वाहतूक कोंडी आणि राजकीय प्रतिक्रिया याबाबत संपूर्ण बातमी.
वरळी आंदोलन गिरीश ...
Continue reading
भाजप मित्रपक्ष रणनीतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. शिंदे आणि पवार गटांच्या आमदारांच्या मतदारसंघात भाजपने बड्या नेत्यांना प्रभा...
Continue reading
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानामुळे राज्यात पुन्हा...
Continue reading
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान असलेले छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान पुणे जिल्ह्यात एक गंभीर पण सुदैवाने अनर्थ टळलेल...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या “ऑपरेशन टायगर” या कथित राजकीय हालचालीची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील तब...
Continue reading
Richest Person in Pawar Family : पवार कुटुंबातील सर्वात श्रीमंत ‘पवार’ कोण? तिसऱ्या क्रमांकावर धक्कादायक नाव
महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
अंधश्रद्धा, फसवणूक आणि सत्तेच्या लालसेचा एक विचित्र संगम उघडकीस आणणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. ...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री Bachchu Kadu यांच्यावर खुनाचा कट रचल्याचा ग...
Continue reading
अंबरनाथमध्ये थेट काँग्रेसशी हातमिळवणी
दुसरीकडे, अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेससोबत युती केली. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी विचारधारा बाजूला ठेवल्याची टीका विरोधकांकडून जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कठोर भूमिकेमुळे आता संबंधित स्थानिक नेत्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/priya-bapat-competes-with-shweta-tiwari-see-7/