अकोल्यातील अकोट आणि ठाण्यातील अंबरनाथ येथे सत्तेसाठी भाजपने काँग्रेस व एमआयएमसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कट्टर विरोधकांसोबत स्थानिक पातळीवर युती केल्याने भाजपवर तीव्र टीका होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“भाजपची काँग्रेस किंवा एमआयएमसोबत युती कधीच होऊ शकत नाही. हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पक्षाच्या विचारधारेविरोधात जाणाऱ्यांवर १०० टक्के कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
अकोटमध्ये ‘अकोट विकास मंच’ आणि एमआयएमचा सहभाग
अकोट नगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला. मात्र, या मंचामध्ये ओवेसींच्या एमआयएम पक्षाचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Related News
अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला; तासभर चर्चा, पण ‘वर्षा’वरील आंदोलनावर जरांगे ठाम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्...
Continue reading
शिवसेना पक्षाचं चिन्ह अन् नाव कोणाचं? राहुल नार्वेकरांचा मोठा दावा; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना पक्षाचं...
Continue reading
दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं थेट विधान; ‘हजारो शाळा आहेत, सर्व काही व्यवस्थित असल्याचा दावा नाही’
शिक्षणमंत्री द...
Continue reading
Prithviraj Chavan : भाजपला बाजूला ठेवून 2014 मध्येच सरकार स्थापनेचा प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारा दावा ...
Continue reading
गुजरातच्या घोटाळेबाज बँकेकडे महाराष्ट्रातील नागरी बँकांचं नेतृत्व; संजय राऊतांचा गंभीर आरोप
गुजरातमधील माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलिनीकरणावरून म...
Continue reading
हा खोका इथे कुणी ठेवला? आदित्य ठाकरे म्हणाले… पत्रकाराने दिलं हजरजबाबी उत्तर, उपस्थितांमध्ये हास्याची लाट
आदित्य ठाकरे : महाराष्ट्राच्या राजकार...
Continue reading
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय फायदा होईल’
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू ...
Continue reading
“मला खात्री होती कोट मिळणार…”; भरत गोगावले यांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट, रायगडच्या पालकमंत्रिपदावर मोठं भाष्य
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला असून शिवसेना शिंदे गटाचे...
Continue reading
मोठी बातमी! आज ओमराजे निंबाळकरांची खरी परीक्षा; मातोश्रीवर घडामोडींना वेग, ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात...
Continue reading
शरद पवारांच्या 8 खासदारांची उद्या मोदींसोबत भेट; फडणवीस-जयंत पाटलांचा एकत्रित विमान प्रवास, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या रा...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
अंबरनाथमध्ये थेट काँग्रेसशी हातमिळवणी
दुसरीकडे, अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेससोबत युती केली. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी विचारधारा बाजूला ठेवल्याची टीका विरोधकांकडून जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कठोर भूमिकेमुळे आता संबंधित स्थानिक नेत्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/priya-bapat-competes-with-shweta-tiwari-see-7/