अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो शिवभक्तांची यात्रा दरवर्षी आयोजित होते.
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
यंदाही 28 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, यात्रेपूर्वी गांधीग्राम घाट परिसरातील सुरक्षा व व्यवस्थापनाचा
आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सकाळी 10 वाजता भेट दिली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी,
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग,
ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान घाटावर बॅरिकेडिंग, रस्त्यांची स्वच्छता, पथदिवे, वाहतुकीची सोय,
जलस्तराची स्थिती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शिवभक्तांना
कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.