आदर्श ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई यांचा सत्कार – ‘माझी वसुंधरा 5.0’ मध्ये प्रथम पुरस्कारासह 50 लाखांचे पारितोषिक

मनोज गवई

बार्शी टाकळी तालुक्यातील राजनखेड येथील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी मनोज देविदास गवई यांचा पंचायत समिती बार्शी टाकळी येथील वसंतराव नाईक सभागृहात शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  गवई यांनी ग्रामसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत बार्शी टाकळी तालुक्याचे व अकोला जिल्ह्याचे मान उंचावले आहे. त्यांनी सन 2017 मध्ये राजनखेड गावात रुजू होऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात हागणदारी मुक्ती साधली, कोविड-19 काळात लसीकरण व जनजागृती करून नागरिकांचे आरोग्य सुधारले आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हा व विभागस्तरीय पुरस्कार मिळवून गावाला मोठे पारितोषिक मिळवून दिले.

अलीकडेच ‘माझी वसुंधरा 5.0’ अंतर्गत अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळवून रु. 50 लाखांचे पारितोषिक राजनखेड ग्रामपंचायतला मिळवून देणे ही त्यांच्या कार्याची नवीन उंची ठरली. या यशामुळे बार्शी टाकळी तालुक्याची प्रतिष्ठा राज्यस्तरावर वाढली असून विविध स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे.

सत्कार कार्यक्रमास गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जि. प. अकोला  रविकांतजी पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनीता इंगळे, प्रशासन अधिकारी दिलीप शिरसाट, विस्तार अधिकारी (पंचायत) दीपक इंगळे, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बोचरे, तालुकाध्यक्ष  नारायणजी दिवनाले, सचिव राजेश बंड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबडे आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

Related News

कार्यक्रमाचे अध्यक्ष  रविकांतजी पवार यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांनीमनोज गवई यांचा आदर्श घेत काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष नारायणजी देवाने केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी तांबडे यांनी केले.

read also :  https://ajinkyabharat.com/important-information-for-punyatil-domestic-gas-customers-customers-who-do-not-do-kyc-will-not-get-the-cylinder/

Related News