अकोला – गणरायाचे आगमन समीप आले असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी अकोल्यातील
महिला मूर्तिकार रेवती नीरज भांगे यांनी एक वेगळीच चळवळ उभारली आहे.
लाल मातीपासून सहज विसर्जित होणाऱ्या व निसर्गाला हानी न पोहोचविणाऱ्या गणेशमूर्तींची निर्मिती करून त्या जनजागृतीचे कार्य करत आहेत.
रेवती भांगे यांनी बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून २०१७ साली डीपीएड (फाईन आर्ट) पूर्ण केले.
छंदाला व्यावसायिकतेची जोड देत त्यांनी मूर्तीशिल्पकलेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा ध्यास घेतला आहे.
अर्ध्या फुटापासून दोन फुटांपर्यंत आकाराच्या लाल मातीच्या आकर्षक मूर्ती त्या तन्मयतेने घडवितात.
शहरातील विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून रेवती भांगे शाळा-महाविद्यालयांत कार्यशाळा
घेऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देतात.
मागील आठ वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून त्यांनी आतापर्यंत सुमारे ३० हजार ‘लिली’ फुलांच्या बियांचे वितरण केले आहे.
रेवती भांगे यांची ही ध्येयवेडी चळवळ केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत नाही तर समाजाला वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाची प्रेरणाही देते.
Read also :https://ajinkyabharat.com/kurankhedcha-bhumiputra-ankush-rajesh-chavan-jhala-cs/