सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावातील ग्रामपंचायत सदस्य व महिला ग्रामसभा बचत गट यांनी दि.२७ जाने.२०२५ ला जिल्हापरिषदेचे
मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते व २८ फेब्रु.२०२५ कळंबा बोडखे येथील ग्रामपंचायत
Related News
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;
अधिकारी यांना निवेदन दिले.परंतू अद्यापही गावातील महिलांना पाणी मिळाले नाही.त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा
परिषद वाशिम व कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वाशिम यांनी ३० ते ४०दिवसात आपणास संपूर्ण
गावाला पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.त्याबाबीचा विसर या वरिष्ठांना पडल्याचे निवेदनकर्तेचे म्हणणे आहे.
या दिलेल्या निवेदनातून स्पष्ट होते.जलजीवन मिशन योजनेतंर्गत उपविभाग मंगरुळपीर यांच्या मार्गदर्शनात हि योजना राबविण्यात आली.
परंतू हि योजना अंदाजपत्रकानुसार योजना राबविण्यात न आल्यानेच गावातील लोकांना अद्यापही पिण्याचे पाणी मिळत नाही.
हि बाब पाणीपुरवठा विभागासाठी शोकांतिका असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले शब्द हवेतच विरले आहेत.त्यामुळेच नाईलाजास्तव दि.८एप्रील २०२५
रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना कळंबा बोडखे गावाला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होण्यासाठी निवेदन दिले
त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे.जर ७ दिवसाच्या आत पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर दि.२१एप्रिल रोजी अकोला
नाका स्त्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या
कार्यालयावर हंडा डोक्यावर घेऊन धडक मोर्चा काढला जाईल व यादरम्यान कोणताही
अनुचित प्रकार घडला तर सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल असेही निवेदनात म्हटले आहे.
याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम यांनाही कळवण्यात आले आहे.
मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर ,शुद्ध जल या संकल्पनेला हारताळ फासल्या गेली.
हे मात्र यावरुन स्पष्ट दिसते.