जिल्हा परिषदेच्या एका शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यात
आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या
शिक्षकांकडे पालक आपल्या मुलांना सोडून बिनधास्त राहतात,
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
ज्या शिक्षकाला गुरु म्हटले जाते, त्यानेच हा प्रकार केला.
शिक्षकाने केलेल्या या प्रकारानंतर मुली रडत रडत घरी आल्या अन्
काय घडले ते पालकांना सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील या
घटनेनंतर पुन्हा समस्त पालकवर्ग चिंतत आला आहे. बाळशीराम
यशवंतराव बांबळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. अहमदनगर
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत
तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी बाळशीराम यशवंतराव
बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले. दुपारच्या सुट्टीत एक
मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना
सांगितला. या प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम
बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले होते. मुख्यध्यापकांनी त्या
सर्व मुलींना बोलवून चौकशी केली. त्यांनी त्या शिक्षकाच्या
कारनाम्याचा पाढा वाचला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल केला. वर्गशिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे हे
शाळेत नव्याने रूजू झाले. ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत
आहेत. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी उल्लेख
करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन
मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून
पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध बीएनएस कलम ७४,७५,
बालकांचे लैंगिक अत्याचार कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र
देशमुख करत आहेत.