Dhule News : अवघ्या दोन गुणांनी आर्मीत भरती होण्याची संधी हुकल्याने धुळ्यातील तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.
Dhule News : आर्मीत (Indian Army) भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या धुळे
(Dhule) तालुक्यातील रामी येथील उच्च शिक्षित तरुणाने अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्याने
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
आलेल्या नैराश्यातून आपल्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अक्षय यशवंत माळी (21) (Akshay Mali) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील रामी गावातील अक्षय माळी हा तरुण आर्मीमध्ये भरती होण्यासाठी झटत होता.
कुटूंबातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत तो बीएस्सीचे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत होता.
मात्र दोन मार्कांनी त्याची संधी हुकल्याने तो निराश झाला होता.
शेतात दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास
अक्षय माळी याने दि. 25 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास गावालगत मोडळ नदी
परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
डॉ. विद्या गायकवाड यांनी तपासणी करीत त्याला मृत घोषित केले.
याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,
पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी घेतली माळी कुटुंबियांची भेट
दरम्यान, अक्षय माळी याच्या आत्महत्येनंतर जिल्हा पोलीस
अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
अक्षय माळी याची आत्महत्या मला अस्वस्थ करून गेली आहे,
अशा भावना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केल्या.
अक्षयचे वडील यशवंत माळी हे शेतकरी आणि माळकरी असून, मुलाच्या दु:खाने ते कोसळले आहेत.
मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतो, दोन दिवसांपासून झोप लागत नाही,
असे सांगताना त्यांचे हुंदके आवरत नव्हते. मी कधी त्याला शेतात कष्ट करायला पाठवले नाही.
हवे ते शिक, असेच नेहमी सांगत होतो. मात्र, आज त्यालाच खांद्यावर उचलावे लागले,
या शब्दांत त्यांनी हुंदके देत आपल्या भावना एसपी धिवरे यांच्याकडे व्यक्त केल्या.
या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.