Dhule News : अवघ्या दोन गुणांनी आर्मीत भरती होण्याची संधी हुकल्याने धुळ्यातील तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.
Dhule News : आर्मीत (Indian Army) भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या धुळे
(Dhule) तालुक्यातील रामी येथील उच्च शिक्षित तरुणाने अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्याने
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
आलेल्या नैराश्यातून आपल्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अक्षय यशवंत माळी (21) (Akshay Mali) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील रामी गावातील अक्षय माळी हा तरुण आर्मीमध्ये भरती होण्यासाठी झटत होता.
कुटूंबातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत तो बीएस्सीचे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत होता.
मात्र दोन मार्कांनी त्याची संधी हुकल्याने तो निराश झाला होता.
शेतात दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास
अक्षय माळी याने दि. 25 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास गावालगत मोडळ नदी
परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
डॉ. विद्या गायकवाड यांनी तपासणी करीत त्याला मृत घोषित केले.
याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,
पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी घेतली माळी कुटुंबियांची भेट
दरम्यान, अक्षय माळी याच्या आत्महत्येनंतर जिल्हा पोलीस
अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
अक्षय माळी याची आत्महत्या मला अस्वस्थ करून गेली आहे,
अशा भावना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केल्या.
अक्षयचे वडील यशवंत माळी हे शेतकरी आणि माळकरी असून, मुलाच्या दु:खाने ते कोसळले आहेत.
मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतो, दोन दिवसांपासून झोप लागत नाही,
असे सांगताना त्यांचे हुंदके आवरत नव्हते. मी कधी त्याला शेतात कष्ट करायला पाठवले नाही.
हवे ते शिक, असेच नेहमी सांगत होतो. मात्र, आज त्यालाच खांद्यावर उचलावे लागले,
या शब्दांत त्यांनी हुंदके देत आपल्या भावना एसपी धिवरे यांच्याकडे व्यक्त केल्या.
या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.