बोरगाव मंजू (प्रतिनिधी):
राष्ट्रीय महामार्गावर धावत असलेल्या टाटा सुमो वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना
८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, बडनेरा येथून अकोल्याच्या दिशेने निघालेल्या टाटा सुमो (MH-27-AC-3738) वाहनात तीन महिला,
एक चिमुकला, चालक व इतर प्रवासी अशा एकूण नऊ जणांचा प्रवास सुरू होता.
दरम्यान गाडी बोरगाव मंजू जवळ आली असताना चालकाच्या लक्षात गाडीमधून धूर निघत असल्याचे आले.
त्याने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली व सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
गाडी झाली भस्मसात, प्रवाशांची सुटका
प्रवाशांना बाहेर काढताच काही क्षणांतच गाडीने अचानक पेट घेतला व संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
काही क्षण उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.
प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकत “दैव बलवत्तर म्हणून वाचलो,” अशी प्रतिक्रिया दिली.
घटनास्थळी एकच झुंबड
आगीचे दृश्य पाहण्यासाठी महामार्गावर बघ्यांची गर्दी जमली होती.
दरम्यान, पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य हाती घेतले.
या घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.