नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पेटल्याने राष्ट्रीय महामार्गावर भीषण दृश्य निर्माण झाले.
Related News
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
धगधगत्या आगीमुळे संपूर्ण महामार्ग हादरून गेला, अन् परिसरात एकच हाहाकार माजला!
इंजिनातून लागलेल्या आगीत काही क्षणांतच ट्रक जळून खाक झाला. अंदाजे ३ लाखांचे गट्टू
आणि २० लाखांचा ट्रक या आगीत भस्मसात झाला. ट्रकमधून उठलेल्या धुराच्या लोटांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अग्निशामक दल वेळेवर पोहोचलेच नाही! यामुळे आग अधिक भडकली
आणि मोठे नुकसान टाळता आले नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश महाजन व पथकाने
घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नाने आग अखेर आटोक्यात आणण्यात आली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही दुर्घटना प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जळजळीत उदाहरण ठरली!