नवी दिल्ली / नाशिक (दि. ६ मे):
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता केंद्र सरकारने
देशभरात ७ मे रोजी युद्धसदृश मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
ही मॉक ड्रिल एकाच वेळी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये होणार आहे.
दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांचे मुख्य सचिव,
नागरी संरक्षण सचिव, एनडीआरएफ व एसडीआरएफ अधिकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
या बैठकीत प्रत्येक राज्याला मॉक ड्रिलबाबत सविस्तर सूचना दिल्या जात आहेत.
यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील बैठकीचे ब्रिफिंग देण्यात येणार आहे. यामध्ये हवाई हल्ला,
ब्लॅकआऊट, सुरक्षित स्थलांतर आणि आपत्कालीन प्रतिसाद यासारख्या घटकांचा समावेश असणार आहे.
नाशिकसह राज्यभर तयारी पूर्णत्वाकडे
नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक पार पडली असून पोलीस, अग्निशमन,
आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यक साहित्य, रुग्णवाहिका,
वायरलेस सिस्टम आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकार हायअलर्टवर
राज्य सरकारकडून अंतर्गत हालचालींना वेग देण्यात आला असून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना जिल्हास्तरावर संपर्कात राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मॉक ड्रिलमागील हेतू काय?
सध्या भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव असून युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत नागरिकांनी आपत्कालीन स्थितीत स्वतःची सुरक्षा कशी करावी, यासाठी ही मॉक ड्रिल घेण्यात येत आहे.
नागरिकांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharat-udya-vajnar-western-siren/