मुंबई | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील
नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली, कुटुंबांना आधार
बैठकीदरम्यान पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील.
केवळ आर्थिक मदतीपुरतंच नव्हे तर त्यांच्या शिक्षण, रोजगाराच्या बाबतीतही शासन मदत करणार आहे.“
संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी
या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. राज्य सरकारने त्यांच्या मुलीला –
असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारचा ठाम निर्णय – ‘कुटुंब एकटं नाही’
राज्य सरकारने यावेळी स्पष्ट केलं की, हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांना सर्व प्रकारची शासकीय मदत पुरवली जाईल.
या निर्णयाने पीडित कुटुंबीयांना मानसिक आणि सामाजिक आधार मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील नागरिकांना गमवण्याची दु:खद घटना असली,
तरी राज्य सरकारने घेतलेला संवेदनशील निर्णय ही त्या कुटुंबांसाठी दिलासा देणारी बाब आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/18-years-ipl-14-varshachaya-poracha-tararak-karnama/