मुंबई | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील
नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली, कुटुंबांना आधार
बैठकीदरम्यान पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील.
केवळ आर्थिक मदतीपुरतंच नव्हे तर त्यांच्या शिक्षण, रोजगाराच्या बाबतीतही शासन मदत करणार आहे.“
संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी
या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. राज्य सरकारने त्यांच्या मुलीला –
असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारचा ठाम निर्णय – ‘कुटुंब एकटं नाही’
राज्य सरकारने यावेळी स्पष्ट केलं की, हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांना सर्व प्रकारची शासकीय मदत पुरवली जाईल.
या निर्णयाने पीडित कुटुंबीयांना मानसिक आणि सामाजिक आधार मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील नागरिकांना गमवण्याची दु:खद घटना असली,
तरी राज्य सरकारने घेतलेला संवेदनशील निर्णय ही त्या कुटुंबांसाठी दिलासा देणारी बाब आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/18-years-ipl-14-varshachaya-poracha-tararak-karnama/