मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या काही दिवस आधीच दादरच्या एका प्रतिष्ठित मराठी शाळेला कायमचं टाळं
लागणार असल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नाबर गुरुजी विद्यालयाचा
30 एप्रिल हा शेवटचा दिवस ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पटसंख्येच्या अभावाने मराठी शाळांवर
Related News
उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार Rose Gulkand Ice Cream ; चव आणि सुगंधाचा खास मेळ
‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’; अजित पवार गटात नेमकी ती महिला कोण?
मुंबईकरांना वर्क फ्रॉम होम दिलं पाहिजे? IT इंजिनियरचा व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणताहेत, ‘हा व्हिडीओ बॉसला दाखवा’
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आसामचे ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ, उष्णतेपासून मिळेल आराम
अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून ही शाळा त्याचा ताजा बळी ठरली आहे.
फक्त 18 विद्यार्थी उरले शाळेत
या शाळेत यंदा दहावीमध्ये केवळ 24 विद्यार्थी होते. आता संपूर्ण माध्यमिक विभागात मिळून फक्त 18 विद्यार्थी शिल्लक राहिले असून
— आठवीत 9 आणि नववीत 9 — या कमी संख्येमुळे शाळा बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.
मराठी शाळा — अस्तंगत होणाऱ्या अस्मितेचं प्रतिबिंब
शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मिळणारे महत्त्व, पालकांचा कल,
तसेच सरकारी पातळीवर पुरेशी मदत न मिळाल्यामुळे मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
सोशल मीडियावरही या घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत असून,
“महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मायबोलीच्या शाळेला टाळं लागणं ही अस्मितेची शोकांतिका आहे,”
अशा भावना व्यक्त होत आहेत.
कोणत्या गोष्टी कारणीभूत?
इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा वाढता ओढा
सरकारी अनुदान व शिक्षक भरतीतील अडथळे
सीबीएसई व आयसीएसई बोर्डांची वाढती लोकप्रियता
शहरीकरण आणि स्थलांतरामुळे कमी होत असलेली विद्यार्थी संख्या
उपायांची गरज — केवळ भावना नव्हे, कृती हवी
भविष्यात अशी स्थिती टाळायची असेल तर शासनाने सक्रिय धोरण आखणे गरजेचे आहे.
मराठी शिकवणे सक्तीचे करणे, मराठी शाळांना आधुनिक शैक्षणिक साधनांनी सुसज्ज करणे,
शिक्षकांचे प्रशिक्षण, आणि पालकांमध्ये भाषिक अस्मितेबाबत जागरूकता निर्माण करणे —
हे सर्व पावले आता तातडीने उचलण्याची गरज आहे.
