जी क्रूरता औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत केली होती.
आज तीच क्रूरता संतोष देशमुख यांच्या हत्येत दिसली आहे.
त्यांच्या मृत्यूचा खेळ राजकारण्यांनी केला, असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे
Related News
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे,
हे दिसत आहे. समोर आलेल्या गोष्टींमधून किती पराकोटीचे क्रौर्य या महाराष्ट्रात,
बीडमध्ये घडलं हेच दिसतं आहे आणि हे सर्व आरोपी मुंडे यांच्याशी संबंधित आहेत.
त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या, दहशत, दाखवून कसे मतदान करू दिले नाही
हे सत्ताधाऱ्यांनी पाहिले होते. त्यांची निवडणूक त्याचवेळी रद्द झाली असती तर आज संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता,
असे खडेबोल यावेळी राऊत यांनी सुनावले. मुख्यमंत्री काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.
ते कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत. फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर राज्यात
इतर कोणीही कायद्याचा गैरवापर करू नये, याची त्यांनी काळजी घ्यायला हवी,
असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/ruikhed-shri-bagaji-maharaj-yatranimitta-miscellaneous-program/