चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. करोडी गावातील उपसरपंच
मंगेश घुले यांनी या समस्येची वारंवार तक्रार केली होती,
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
ग्रामस्थ आणि सरपंचांच्या तक्रारीची दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी
जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
अकोट वरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने
अनेक गावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचत नाही.
चोहोटा बाजार परिसरातील नागरिक संपूर्णतः
जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली असून,
आमदार सावरकर यांनीही जलसंपत्ती विभागाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.