पातुर (प्रतिनिधी) –
श्रमिक भारती अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, चरणगाव लोकमान्य वाचनालय व ग्रामीण जनहित लोकसेवा
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगा लागवड विषयक एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
Related News
उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,
मशालीतून उठली आग – शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी ‘प्रहार’चा एल्गार!
२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल
अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी
Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाचा उपक्रम – 14 व 15 एप्रिलला मोफत टूर सर्किट
किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान
या उपक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेवगा लागवडीचे तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील संधींबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोकराव मेतकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब देशमुख,
हिम्मतराव टप्पे, ज्ञानेश्वर नागलकर, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर,
पातुर पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख उपस्थित होते.
मार्गदर्शनासाठी शेतीतज्ज्ञ डॉ. नंदकिशोर देशमुख यांची उपस्थिती लाभली.
कार्यशाळेची सुरुवात कृषीभूषण दादाराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली.
तेजराव देशमुख यांनी शेवगा लागवडीसंदर्भातील तांत्रिक माहितीचे प्रस्ताविक केले.
त्यानंतर डॉ. नंदकिशोर देशमुख यांनी शेतकऱ्यांना बियाण्याची निवड, लागवडीची पद्धत, मशागत,
खत व्यवस्थापन आणि विपणन प्रणाली यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
या कार्यक्रमात श्रीराम टाळे, साहेबराव पाटील, पुंडलिकराव निखाळे, केशवराव माजरे, विश्वासराव खुळे, लक्ष्मण रावतआले,
विजयराव देशमुख, निलेश देशमुख, रामराव इंगळे, राजेश देशमुख, प्रवीण देशमुख, श्रीकांत गाडेकर,
विजय पोरे, प्रदीप देशमुख, संतोष वाघे, बाळासाहेब देशमुख, अविनाश ताळे, मुरलीधर शिरसागर,
अनिल देशमुख, सौ. शिल्पा गजेश देशमुख, आशिष चोरमल आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन निलेश देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन कंपनीच्या सीओ सौ. शिल्पा गजेश देशमुख यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले.