बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित

बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित

अकोट तालुका प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार

नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आजुबाजुच्या परीसरात ही चांगलाच धिंगाना घालत ममोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

Related News

रात्री काही गावामध्ये मुसळधार पाऊस बरसला,बुधवारी देखील सुसाट वाऱ्यांसह मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटासह सुरुवात केली.

यामध्ये अनेक वृक्ष कोलमडली.काही ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला होता.

या मुसळधार पावसामुळे पिकांना चांगलाच फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.दुपार नंतर वातावरणात अचानक बदल झाला

आणि सुरुवातीला काही गावांना पावसाने चांगलेच झोडपले.याची दखल घेऊन शासनाच्या वतिने ताबडतोब पाहणी करून

पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.यांचे पाहणी व पंचनामा करतांना कृषी सहायक सुनील ठाकरे,

तलाठी के डी पवार बोर्डी,तलाठी राजाभाऊ खामकर शिवपूर,शेतकरी अल्ताफ अली,नंदलाल ताडे,अशोक ताडे,तुळशीदास वाघमारे,

यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.यामध्ये अंदाजे १७००/१८०० हेक्टरवरील पिकांचे

नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.यामध्ये सर्वाधिक संत्रा,केळी,लिंबु,मान्सुन पुर्व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही गावांत दुपार नंतर वादळी पावसाने सुरुवात केली.

त्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

या पावसामुळे पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.वादळी पावसाने विजेचे पोल वाकल्याने तारादेखील तुटल्या होत्या.

त्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता.याशिवायत अनेक घरावरील टीनपत्रे उडाली रस्त्यांवर झाडेदेखील कोसळली.

शासनाने आता कुठलेही निकष न लावता लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा कडुन केली जात आहे.

झालेल्या नुकसानीचे पाहणी व पंचनामा करतांना कृषी विभागाचे,व महसूलचे कर्मचारी

Read Also :https://ajinkyabharat.com/aychi-readiness-aani-devachi-kripaaviman-aapchatun-chimukali-bachavali/

Related News