मणिपूरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं
आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जावं. राजकारण बाजूला ठेऊन
देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. तिथल्या महिलांना आणि नागरिकांना
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
न्याय मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांना अनेकवेळा केली आहे,
असं म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर
निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात देखील गुन्हेगारी वाढली असं केंद्र
सरकारकडूनच सांगण्यात येत आहे. राज्यातील सरकार अपयशी ठरलं आहे.
काल बारामतीत घटना घडली ती दुर्दैवी आहे. अशा घटना होऊ नये असं
माझं मत आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. भाजपकडून इतिहास बदलण्याचा
प्रयत्न आहे. भाजपचे लोक चुकीचा इतिहास मांडत आहे. मात्र आम्ही त्यांना मांडू
देणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांवर जनतेने प्रेम आणि
विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे. त्याची ही पोहोचपावती
आहे. दिल्लीत शरद पवार यांच्याकडे एक हक्काचा माणूस म्हणून बघितलं जातं,
पण जरी वेगळा पक्ष असला तरी आणखी एक आपला हक्काचा माणूस आहे,
ते म्हणजे नितीन गडकरी. तसेच बारामतीचा जागा कुठला पक्ष लढवणार हे अजून
निश्चित झालेलं नाहीय. गणेशोत्सवानंतर यावर चर्चा होईल. कोण-किती जागा लढवणार,
यावर निर्णय झाला आहे, अशी माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/stop-land-acquisition-of-bhaktipeeth-and-industrial-highways/