अकोला:
सावित्रीमाई फुले यांची जयंती आज अकोटमध्ये धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
त्यांच्या कार्याची आणि त्यांचे योगदान समाज सुधारणा, स्त्री शिक्षण, आणि महिला अधिकारांसाठी असलेल्या संघर्षाची
आठवण करून देत भारतीय जनता पक्षाने सदस्य नोंदणी अभियान राबवले.
Related News
नेपाळ : महापुराने संसार उद्ध्वस्त केला, पण कुत्र्याची आशा कायम; मालकाच्या प्रतीक्षेत 5 दिवस
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; फडणवीसांचे पुणेकरांना आवाहन
राहुल गांधींचे 40 पैकी29 मुद्दे खोटे; फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’वर जोरदार हल्लाबोल!
अभिजीत दीपके यांच्या 5 सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार नाही; मोर्चाचा मार्ग मोकळा
2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50% गरज शेतकरी, तर 50% EVमधून पूर्ण होणार; फडणवीसांचा मोठा दावा
Prashant Kishor यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीनेच केली मोठी चूक; पक्षात खळबळ!
Katrina – Vicky Love Story : कतरिनाला विकी आवडतो हे कधी कळलं? जाणून घ्या दोघांच्या प्रेमकहाणीची खास गोष्ट
घटस्फोट झाला तरी जॉइंट होम लोनची EMI थांबत नाही! कर्जाची जबाबदारी कोणाची?
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली! शुगर रिपोर्टवरच जरांगेंचा सवाल; म्हणाले, “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
हृता दुर्गुळेचा हटके लूक चर्चेत! दोन वेण्या अन् मोठे कान पाहून चाहतेही म्हणाले ‘आरे बापरे!’
कार्यक्रमाचे उद्घाटन कमल सखी मंचच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सावित्रीमाई फुले यांचे कार्य आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कार्य म्हणजे
सामाजिक समरसता आणि महिला सशक्तीकरण, जे भारतीय जनता पक्ष पुढे नेत आहे. भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये मातृशक्तीचा महत्त्वपूर्ण योगदान आहे,
आणि आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद आणि महिला शक्ती प्रखरपणे उभी राहील,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रभाग दोन अकोट फाईल येथे आयोजित या कार्यक्रमात अनिता चौधरी व उत्तर मंडल महिला आघाडीच्या
पुढाकाराने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर होत्या.
यावेळी चंदाताई शर्मा, सुनिता अग्रवाल, अर्चना मसने, गीतांजली शेगोकार, सारिका जयस्वाल, वैशाली शेळके,
अर्चना शर्मा, चंदा ठाकूर, अनिता गिरी, राजेंद्र गिरी, शकुंतला जाधव, सुषमा शुक्ला, मेघा मिश्रा, राजेंद्र चौधरी, रमेश करिहार, नितीन राऊत,
टोनी जयराज, रुपेश यादव, सुमन ताई गावंडे, अनिता घोगलिया आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
सावित्रीमाई फुले यांच्या कार्यावर चर्चा करत, माजी महापौर सुमनताई गावंडे यांनी सांगितले की,
सावित्रीमाई फुले यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर समग्र समाज सुधारण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला.
त्यांनी आपल्या कार्यातून महिलांसाठी आश्रयस्थाने उघडली, विधवांसाठी आश्रम सुरू केले, आणि दुष्काळी परिस्थितीत अन्नाच्या खाण्या न मिळणाऱ्यांना अन्न दिले.
त्याचप्रमाणे, सौ मंजुषाताई सावरकर यांनी ही यावेळी सांगितले की, सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात नव्या दृष्टीकोनातून विचार मांडले.
त्यांचे शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे, तर समाज जागृती आणि मानवतेचा बोध करणे होते.
चंदाताई शर्मा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शावर जोर देत सांगितले की, त्यांचा जीवनदृषटिकोन फक्त विचाराने नव्हे,
तर कृतीने देखील समाजाला अधिक मानवी बनवण्याचा होता.
अनिता चौधरी यांनी यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या कार्याची महती सांगत, त्यांचा संघर्ष समाजाच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण होता,
हे प्रतिपादित केले. त्यांनी त्यांचा आदर्श घेत आजच्या स्त्रीला शिक्षणाने प्रबळ बनवण्याचे आवाहन केले.
गीतांजली शेगोकार यांनी सांगितले की, सावित्रीमाई फुले यांचे कार्य भारतीय समाज क्रांतीची जननी होण्यास योग्य होते.
त्यांचा संघर्ष भारतीय समाजातील स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी अनमोल ठरला.
आरती धोगलीया यांनी विचार व्यक्त करत, सावित्रीमाई फुले यांच्या कार्यामुळेच आज स्त्रिया चंद्र आणि सूर्यापर्यंत पोहोचू शकतात.
पण त्यांच्या पुण्यस्मृतींना जागरणे आजकाल दुर्लक्षित होत आहे, आणि हे अत्यंत शोकांतिका आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मातृशक्ती एकत्र येऊन प्रखरपणे उभे राहतील.
सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करा आणि भारतीय जनता पक्षाच्या समाजवादी विचारधारेला पाठींबा द्या.
सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीचा उत्सव सामाजिक समरसतेसाठी, स्त्री शिक्षणासाठी आणि भारतीय समाजातील प्रत्येक स्त्रीला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/request-against-illegal-liquor-sale-and-worli-matka-in-rural-areas-of-akot/

