नवीन सरकार स्थापन होईपर्यंत प्रतीक्षा
जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांनी
शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज दाखल केले होते. बहुचर्चित
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
लाडक्या बहिणींसह विविध योजनांचा पात्र अर्जदारांना लाभही
मिळाला. मात्र, मंगळवारी (दि. १५) निवडणूक आचारसंहिता
लागल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही थांबवली. त्यामुळे
आता नवीन सरकार स्थापन होईपर्यंत अर्जदारांना प्रतीक्षा करावी
लागणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता
लागू झाल्याने आंदोलन व मोर्चावर निर्बंध आले. सार्वजनिक
ठिकाणे, धरणे, आंदोलने, निदर्शने व उपोषण करण्यास आले.
प्रतिबंध घालण्यात समाजकल्याणच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम
कामगारांची नोंदणी सुरू होती. १४ ऑक्टोबरपर्यंत सहायक
कामगार आयुक्त कार्यालयात जिल्हाभरातील कामगारांची प्रचंड
गर्दी दिसून आली. मात्र, हजारो कामगारांची नोंद होऊ शकली
नाही. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही नोंदणी
थांबविण्यात आली. कामगारांना देण्यात येणारी संसारोपयोगी
भांडी व बोनसही थांबला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी
नव्याने अर्ज स्वीकारणे आता बंद करण्यात आले आहे. यापूर्वी
मंजूर झालेल्या लाभार्थीना नोव्हेंबर अखेरचे मानधन देण्यात आले
आहे. अर्ज करण्याचे पोर्टल बंद झाले. जिल्हातील हजारो पात्र
लाभार्थी बहिणींना अर्ज करण्यासाठी राज्यातील नवीन सरकारची
वाट पाहावी लागणार आहे. बांधकाम कामगार योजनेसाठी नव्याने
अर्ज करण्याचे मार्ग बंद झाले. त्यांना देण्यात येणारी भांडी व
दिवाळी बोनस वितरणही थांबवण्यात आला. वयोश्री व तीर्थदर्शन
योजनेलाही ब्रेक लागला. व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना
तात्पूरत्या बंद झाल्या. काही योजनांचा लाभ सुरू ठेवण्याबाबत
जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविणार
असल्याची माहिती सूत्राने दिली.
Read also:https://ajinkyabharat.com/mla-satish-chavan-suspended-for-6-years-for-anti-party-activities/