बीड :
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी गाजत असलेल्या
वाल्मिक कराड प्रकरणात नवे खुलासे समोर आले आहेत. बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी
विश्वांभर गोल्डे यांनी दिलेल्या जबाबात अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
Related News
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्हा परिषद मध्ये आज दुपारी
वायरिंग शॉट झाल्यामुळे आग लागल्याची घटना घडलीय..यावेळेस जिल्हा परिषद
अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग आट...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी:
पुणे-बेंगळुरू महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली असून, अपघाताचे संकट टळल्याने एक
संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दाढेतून बचावले आहे. ही घटना कणेरीवाडी फाटा परिसरात घड...
Continue reading
हापुड़ | उत्तर प्रदेश:
शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर असावे अशी अपेक्षा असते, पण उत्तर प्रदेशातील हापुड़ जिल्ह्यात एका प्राथमिक शाळेतून
समोर आलेल्या प्रकाराने शिक्षण व्यवस्थेवरच प्रश...
Continue reading
पुणे | 2025 UPSC Results
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2024 च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून
पुण्याचा अर्चित डोंगरे याने देशात तिसरा क्रमांक, तर महाराष्ट्रातून पह...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. २३ (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील खरब ढोरे गावात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्याचे उन्हाळी मुग पीक पूर्णतः नष्ट झाले.
प्रदीप राजाराम तिवारी या शेतकऱ्याच्...
Continue reading
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८
महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ग्रामविकास, महसूल, जलसंपदा, गृहनिर्माण, कामगार...
Continue reading
मुंबई :
मराठा साम्राज्याचा पराक्रमी योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून
रूपेरी पडद्यावर प्रकट झालं आणि प्रेक्षकांनीही या गाथेला उचलून धरलं! वि...
Continue reading
त्र्यंबकेश्वर (नाशिक) :
श्रद्धास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक साधूवेषातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू
झाल्याची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडा...
Continue reading
मुंबई : मुंबईतील लँड स्कॅम प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली असून,
त्यांना “सर्व ल...
Continue reading
इंदौर (मध्य प्रदेश) :
इंदौर शहरातील वाहतूक पोलीस दलात कार्यरत महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोनाली सोनी
या सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत. गाण्याच्या माध्यमातून वाहतूक जनजा...
Continue reading
आग्रा (उत्तर प्रदेश) :
फतेहाबाद परिसरातील एका गावात प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या धक्कादायक प्रकाराने
संपूर्ण परिसरात खळबळ माजवली आहे. एका विवाहित तरुणीच्या घरी तिचा विवाहित प...
Continue reading
मुंबई :
माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झीशान सिद्दीकी यांनी डी
कंपनीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर दावा केला आहे.
झीशान यांना ईमेलद्वारे धमकी दे...
Continue reading
विशेष म्हणजे कराड सध्या तुरुंगात असूनही त्याच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात दहशत कायम असल्याचा दावा खुद्द पोलिस अधिकाऱ्याने केला आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात वाल्मिक कराड गँगवर संशय घेतला गेला होता. यानंतर राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं.
सीआयडी व एसआयटीच्या संयुक्त तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
गोल्डे यांचा जबाब : तुरुंगातूनही दहशत
२३ फेब्रुवारी २०२५ रोजी सीआयडीने गोल्डे यांचा जबाब नोंदवला. या जबाबात त्यांनी नमूद केलं की,
“वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी बीडमध्ये त्याच्या समर्थकांकडून दहशत कायम आहे.“
एवढंच नव्हे, तर कराडला पूर्वीपासून गुन्हेगार म्हणून ओळख असूनही त्याला बीड पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचंही त्यांनी सूचित केलं.
गुन्हेगारी इतिहास आणि बंदोबस्त
वाल्मिक कराडला आवाडा एनर्जी कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात अटक करण्यात आली.
त्यानंतर संतोष देशमुख हत्येप्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या बंदोबस्तासाठी १८ पोलीस
आणि २ आरसीपी प्लाटून तैनात करण्यात आले होते. यावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
रत्नागिरीहून आलेली महिला आणि नवा गूढ तपशील
दरम्यान, हत्याप्रकरणातील एक संशयित कृष्णा आंधळे याचा शोध सुरू असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख
कुटुंबीयांच्या घरी एक अज्ञात महिला दाखल झाली. ती महिला म्हणाली, “माझ्याकडे कृष्णा आंधळेबाबत पुरावे आहेत.”
या महिलेने घराबाहेरच्या मंडपात रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी घरातील बाथरूममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट धरला.
पोलिसांनी तिच्या ओळखीचा तपास सुरू केला असून, ती रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे.
बीड पोलिस दल नव्या वादात
या सगळ्या प्रकरणामुळे बीड पोलिस दलाची विश्वसनीयता आणि कार्यशैली यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तुरुंगात असलेला गुन्हेगार जिल्ह्यात कार्यरत असतो, त्याचे समर्थक पोलीस ठाण्यात गोंधळ घालतात,
आणि तरीही कार्यवाही होत नाही – या सगळ्या घडामोडी पोलीस दलासाठी डोकेदुखी बनल्या आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-yanchayavar-ashish-shelar-or-ghangak/