बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर
कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात
देण्यात आली. उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका
Related News
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी झाली.
तेव्हा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलीस आणि राज्य सरकारच्या कारभारावर
ताशेरे ओढले. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे,
अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला चपराक लगावली.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या महाअधिवक्ता
बीरेंद्र सराफ यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. तपास विशेष पथकाकडे
देण्यापूर्वी बदलापूर पोलीसांनी काय केलं? त्याची कागदपत्रं कुठे आहेत?
पीडीत मुलींचं समुपदेशन केलंत का?, असे सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारले.
यावर राज्य सरकारच्या वकिलांनी म्हटले की, पहिल्या पीडीत मुलीचं समुपदेशन
झालेलं आहे, दुसऱ्या मुलीचं समुपदेशन सुरू आहे. घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी झाली,
पालक 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात आले. याप्रकरणी काल, 21 ऑगस्ट रोजी
एसआयटी स्थापन झाली आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना
निलंबित केलेलं आहे. घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार,
असे महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.
यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे
निर्देश दिले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, प्रश्न शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा आहे.
लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे,
असे खडे बोल हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले.
न्यायमूर्तींनी महाअधिवक्ता यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली.
पीडीत मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवलेत का? बदलापूर पोलीसांनी केलं काय?,
असे सवाल विचारताच महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ निरुत्तर झाल्याचे दिसून आले.
बदलापूर पोलिसांनी याप्रकरणात काहीच कारवाई केल्याचे दिसत नाही.
इतक्या गंभीर प्रकरणात पोलीसांचा हा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
कारवाईचे आदेश देताना आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही खंडपीठाने
राज्य सरकारला दिला. त्यामुळे आता यावर राज्य सरकार मंगळवारी दुपारी होणाऱ्या
सुनावणीत काय बाजू मांडणार, हे पाहावे लागेल.
Read also: https://ajinkyabharat.com/yuvraj-singh-biopic-announced/