पातूर, २५ मार्च २०२५ – मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या
बी.एड. सीईटी परीक्षेसाठी अवघ्या दोन मिनिटे उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले.
कापशी येथील श्री इन्फोटेक ऑनलाइन परीक्षा केंद्रावर घडलेल्या या
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
गाडी पंचर झाल्यामुळे विलंब; प्रवेश नाकारला
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८:३० पर्यंत हजर राहण्याचे निर्देश होते.
मात्र, अभिषेक फलटणकर (शिवणी, मंगरूळपीर, जिल्हा वाशिम) आणि अंकित राऊत
(बेलखेड, तालुका तेल्हारा) हे दोघे नऊ वाजून दोन मिनिटांनी परीक्षा केंद्रावर पोहोचले.
गाडी पंचर झाल्याने त्यांना विलंब झाला होता, असे सांगून त्यांनी परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना विनवण्या केल्या.
मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न ऐकता त्यांना प्रवेश नाकारला, परिणामी दोघांना परीक्षेस मुकावे लागले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम; वरिष्ठांकडून हस्तक्षेपाची मागणी
या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परीक्षेला बसण्याचा त्यांचा संधी गमावल्याने दोघांवर मानसिक तणावाचे संकट ओढवले आहे.
परीक्षा प्रक्रियेतील लवचिकता आवश्यक – नागरिकांची प्रतिक्रिया
उपस्थित नागरिकांनी परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अवघ्या दोन मिनिटांचा विलंब हा गंभीर कारण न मानता
विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी यासाठी वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालावे,
अशी जोरदार मागणी होत आहे.