पातूर, २५ मार्च २०२५ – मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या
बी.एड. सीईटी परीक्षेसाठी अवघ्या दोन मिनिटे उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले.
कापशी येथील श्री इन्फोटेक ऑनलाइन परीक्षा केंद्रावर घडलेल्या या
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
गाडी पंचर झाल्यामुळे विलंब; प्रवेश नाकारला
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८:३० पर्यंत हजर राहण्याचे निर्देश होते.
मात्र, अभिषेक फलटणकर (शिवणी, मंगरूळपीर, जिल्हा वाशिम) आणि अंकित राऊत
(बेलखेड, तालुका तेल्हारा) हे दोघे नऊ वाजून दोन मिनिटांनी परीक्षा केंद्रावर पोहोचले.
गाडी पंचर झाल्याने त्यांना विलंब झाला होता, असे सांगून त्यांनी परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना विनवण्या केल्या.
मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न ऐकता त्यांना प्रवेश नाकारला, परिणामी दोघांना परीक्षेस मुकावे लागले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम; वरिष्ठांकडून हस्तक्षेपाची मागणी
या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परीक्षेला बसण्याचा त्यांचा संधी गमावल्याने दोघांवर मानसिक तणावाचे संकट ओढवले आहे.
परीक्षा प्रक्रियेतील लवचिकता आवश्यक – नागरिकांची प्रतिक्रिया
उपस्थित नागरिकांनी परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अवघ्या दोन मिनिटांचा विलंब हा गंभीर कारण न मानता
विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी यासाठी वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालावे,
अशी जोरदार मागणी होत आहे.