वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कंपनीच्या भिंती, शेड, सुरू असलेल्या यात्रेचे दुकाने, झुले आदींचे मोठे नुकसान झाले आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
काही दिवसा आगोदर जणू सूर्य आग ओकत असल्याचा भास जनसामान्यांना होत होता,
दुपारचा उकाळा पाहून रस्त्यावरील रेलचेल कमी झाली होती.
दि. 18 ला सायंकाळच्या दरम्यान अचानक वादळी वारा सुरू झाला अन् वणी सह परिसरात वादळी
वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान पावसाने सर्वसामान्यांना चांगलाच फटका दिला.
यात काहींच्या घरचे टीन पत्रे, शहर व परिसरातील झाडे पडली, वॉटर टँक उडाल्या, बॅनर फाटले,
तर भालर येथील रॉकवेल मिनरल व हारमोनी कंपनीच्या भिंती पडून परिसरात व मशनरीत पाणी शिरल्याने कंपनीला मोठे
नुकसान झाले यात त्यांचे अंदाजे दिड करोडाचे नुकसान झाल्याचे हुसैन बादशाह यांनी सांगितले.
तसेच श्री रंगनाथ स्वामी यात्रा सुरू असून याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
दुकानांचे छप्पर उडाले काहींचे संपूर्ण दुकाने पडली असुन, झुल्या चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
त्यांचे अं. सात लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या अवकाळी पावसाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसला असुन ज्यांचे
शेतमाल निघायचा होता त्यांच्या शेत मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी सुधा हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला
असून परिसर थंड झाल्याने तर काही ठिकाणी शिरवा पाऊस झाल्याने
थंडीच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/daheigav-case-prohibited-telhara-city-closed-market/