Aurangzeb Tomb Raj Thackeray Demand: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांना राज
ठाकरेंनी केलेल्या मागणीवरुन प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या
Aurangzeb Tomb Raj Thackeray Demand:औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
Related News
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये भाष्य केलं.
यावेळेस त्यांनी या कबरीच्या आजूबाजूची सजावट हटवण्याची मागणी केली आहे.
असं असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी या विधानावरुन
आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला.
भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा
संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना,
“भारताच्या उदारतेचं आणि सर्व सामावेशकतेचं हे प्रतीक आहे,” असं मत नोंदवलं.
राज ठाकरे औरंगजेबच्या कबरीबद्दल नेमकं काय म्हणाले?
“औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला
आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला,” असं राज ठाकरेंनी दसरा मेळाव्यात म्हटलं.
“मराठ्यांनी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही,
उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते!
शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे जोशींनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला.
माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका.
इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे.
तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात,”
अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी राजकारण्यांचा समाचार घेतला.