अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा – नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ टायर जाळून शेतकऱ्यांचा तीव्र निषेध

अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा - नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ टायर जाळून शेतकऱ्यांचा तीव्र निषेध

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग

आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ स्थानिक शेतकऱ्यांनी टायर जाळून आंदोलन केलं.

Related News

आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी प्रहार नेत्यांच्या मागण्यांना तत्काळ मान्यता देण्याची मागणी करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.

टायर जाळून रास्ता रोको करत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “कर्जमाफीच्या मागणीसाठी जर बच्चू कडू यांना अन्नत्याग करावा लागत असेल,

तर हे सरकारचे अपयश आहे.” त्यांनी सरकारला इशारा दिला की जर लवकर निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.

या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.

Read Also : https://ajinkyabharat.com/khamgaon-he-was-present-in-the-presence/

Related News