राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय
अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ने नवा गुन्हा दाखल केला आहे.
Related News
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी मंत्रीपदाचा
गैरवापर करत तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा
देशमुख यांच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होताच देशमुख यांनी
एक्स वरुन तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. विधानसभा निवडणूक
तोंडावर असतानाच देशमुखांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख आरोपी आहेत.
याच गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतरांना आगोदरच
आरोपी करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या जबाबावरुन
हा गुन्हा दाखल झाला आहे. मुंढे यांचा जबाब देशमुख यांच्या विरोधात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये देशमुख मंत्री असताना गिरीश महाजन
यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांचे नाव घेत आरोप केला आहे.
आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर देशमुख दबाव टाकत
असल्याचे म्हटले होते. सीबीआयने गुन्हा दाखल करताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
X वर एक पोस्ट करत अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, धन्यवाद! देवेंद्र फडणवीस,
”माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे.
जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान
सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही.
न झुकता – न डगमगता मी BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/balapur-telhara-talukyat-damage-to-fields-due-to-rain/