काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली.
यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बालटाल आणि तुनवान येथील
बेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील ३,८८० मीटर उंचीवरील
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
गुंफा मंदिराकडे प्रवास सुरु केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनंतनागमधील पारंपरिक ४८ किलोमीटरचा जुनवान-पहलगाम मार्ग
आणि गांदरबलमधील १४ किलोमीटरचा लहान पण उंच बालटाल मार्गावरून पहाटे यात्रेकरू रवाना झाले.
उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नागरी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित
दुहेरी मार्गावरील वात्रेला प्रारंभ झाला.
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी ४,६०३ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला
जम्मूमधील भगवती नगर बेथोल वात्री निवास बेस कॅम्प येथून हिरवा झेंडा दाखवला.
हे यात्रेकरू शनिवारी दुपारी काश्मीर खोऱ्यात दाखल झाल्यानंतर
त्यांचे स्थनिक नागरिक आणि प्रशासनाने स्वागत केले.
अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
त्यासाठी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस
आणि इतर निमलष्करी दलांचे हजारो सुरक्षा कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत.
यात्रेच्या ठिकाणी हवाई देखरेखही ठेवली जाणार आहे.
५२ दिवस चालणारी ही यात्रा १९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.
शनिवारी १८८१ यात्रेकरूंची दुसरी तुकडी भगवती नगर बेस कॅम्प येथून चोख सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-shinde-has-completed-two-years-on-ex-platform-post/