अकोट
अकोट शहरातील मध्यवर्ती भागात सकाळपासून एक पिसाळलेल्या माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
या माकडाने कबुतरी मैदान ते नागमते हॉस्पिटल,गवळीपुरा परिसर ते शिवाजी शाळा परिसरापर्यंत हैदोस घातला
असून यामुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहे. या माकडाच्या हल्ल्यात पाच नागरिक जखमी झाले आहे.
Related News
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
मोठा खुलासा! अहमदाबाद विमान अपघातामागे पक्ष्यांची धडक; दोन्ही इंजिन बंद, 100 हून अधिकांचा मृत्यू
दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान
अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवासी म्हणून उपस्थित
त्यामध्ये महीमा पालेकर वय १२, देवंगणा विनोद वक्ते वय ५६,सुर्वणा गणेश कांगळे वय ३२ आणि पवन.
शिवरकार वय १५ यांचा समावेश आहे.जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याशिवाय,शालिनी अवि पालेकर यांच्या अंगावर वानराने उडी मारून त्यांना दुखापत केली आहे.
तसेच गादी कारखान्याजवळ एका मुस्लिम व्यक्तीवरही वानराने हल्ला केला.मात्र त्या व्यक्तीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर जितेन बरेठिया व अविनाश पालेकर यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साथला.
वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील राऊत यांनी या संदर्भात माहिती देताना”संध्याकाळ पर्यंत आवश्यक बंदोबस्त लावण्यात येईल
आणि माकडाला पकडण्याची कारवाई सुरू आहे असे सांगितले” दरम्यान अकोट
शहरात नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून उपाययोजना सुरू केल्या आहेत.
लवकरच या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्याची कारवाई चालू आहे.
कोणीही घाबरू नका असा विश्वास व्यक्त केला आहे.