अकोल्यातील बाळापूर शहरात आज झालेल्या दमदार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
जोरदार बरसलेल्या पावसामुळे बाळापूर शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झालं आहे.
वादळी वारा आणि पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
Related News
त्यामुळे शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी 24 तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती आहे.
मात्र आज झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
