अकोला: शेतमालाला योग्य हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या
अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले.
Related News
नेपाळ : महापुराने संसार उद्ध्वस्त केला, पण कुत्र्याची आशा कायम; मालकाच्या प्रतीक्षेत 5 दिवस
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; फडणवीसांचे पुणेकरांना आवाहन
राहुल गांधींचे 40 पैकी29 मुद्दे खोटे; फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’वर जोरदार हल्लाबोल!
अभिजीत दीपके यांच्या 5 सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार नाही; मोर्चाचा मार्ग मोकळा
2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50% गरज शेतकरी, तर 50% EVमधून पूर्ण होणार; फडणवीसांचा मोठा दावा
Prashant Kishor यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीनेच केली मोठी चूक; पक्षात खळबळ!
Katrina – Vicky Love Story : कतरिनाला विकी आवडतो हे कधी कळलं? जाणून घ्या दोघांच्या प्रेमकहाणीची खास गोष्ट
घटस्फोट झाला तरी जॉइंट होम लोनची EMI थांबत नाही! कर्जाची जबाबदारी कोणाची?
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली! शुगर रिपोर्टवरच जरांगेंचा सवाल; म्हणाले, “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
हृता दुर्गुळेचा हटके लूक चर्चेत! दोन वेण्या अन् मोठे कान पाहून चाहतेही म्हणाले ‘आरे बापरे!’
या आंदोलनात शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा त्वरित लागू करावा.
- सरसकट कर्जमुक्ती द्यावी.
- सोयाबीन – ₹6,000, हरभरा – ₹8,000, कापूस – ₹10,000, तूर – ₹12,000 प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा.
- स्वामिनाथन आयोग लागू करावा.
- पीक कर्जावर (CIBIL) अट लागू करू नये.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने करावा.
- रब्बी व खरीप हंगामासाठी प्रती एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरील जीएसटी (GST) रद्द करावी.
रात्रभर सुरू राहिले आंदोलन
हे आंदोलन रात्री १० वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कीर्तन व भजन गात आपला आवाज बुलंद केला.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सरकारला इशारा
या आंदोलनामुळे सरकारची झोप उडावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा,
हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/gold-and-silver-sparkle-mahagaichi-tutari/

