अकोला: शेतमालाला योग्य हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या
अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले.
Related News
तणावमुक्त जीवनाचे गुपित! झोपेचे महत्त्व जाणून घ्या
नाशिक धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा मोठा गौप्यस्फोट
Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट! मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची एंट्री
16 वर्षांनंतर न्यायाचा विजय! विपुल अमृतलाल शाह प्रकरणात निर्माते दोषी
एलपीजीला पर्याय मिळणार? स्वयंपाकासाठी Ethanol चा सरकारचा मोठा प्लॅन
या आंदोलनात शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा त्वरित लागू करावा.
- सरसकट कर्जमुक्ती द्यावी.
- सोयाबीन – ₹6,000, हरभरा – ₹8,000, कापूस – ₹10,000, तूर – ₹12,000 प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा.
- स्वामिनाथन आयोग लागू करावा.
- पीक कर्जावर (CIBIL) अट लागू करू नये.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने करावा.
- रब्बी व खरीप हंगामासाठी प्रती एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरील जीएसटी (GST) रद्द करावी.
रात्रभर सुरू राहिले आंदोलन
हे आंदोलन रात्री १० वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कीर्तन व भजन गात आपला आवाज बुलंद केला.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सरकारला इशारा
या आंदोलनामुळे सरकारची झोप उडावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा,
हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/gold-and-silver-sparkle-mahagaichi-tutari/

