अकोला: शेतमालाला योग्य हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या
अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले.
Related News
सोने-चांदी दरात घसरण; सोने खरेदीसाठी योग्य वेळ?
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणारे 5 प्रभावी मसाले; जाणून घ्या त्यांचे फायदे
जागतिक संकेतांचा परिणाम; शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला
50 वर्षांनंतर मिळालं खरं यश; Rakesh Bedi चं कौतुक करताना डेविड धवन भावुक
11 व्या वर्षी शाळा सोडली, 60 रुपयांसाठी भांडी घासली—Munawar Faruqui चा संघर्ष
या आंदोलनात शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा त्वरित लागू करावा.
- सरसकट कर्जमुक्ती द्यावी.
- सोयाबीन – ₹6,000, हरभरा – ₹8,000, कापूस – ₹10,000, तूर – ₹12,000 प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा.
- स्वामिनाथन आयोग लागू करावा.
- पीक कर्जावर (CIBIL) अट लागू करू नये.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने करावा.
- रब्बी व खरीप हंगामासाठी प्रती एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरील जीएसटी (GST) रद्द करावी.
रात्रभर सुरू राहिले आंदोलन
हे आंदोलन रात्री १० वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कीर्तन व भजन गात आपला आवाज बुलंद केला.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सरकारला इशारा
या आंदोलनामुळे सरकारची झोप उडावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा,
हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/gold-and-silver-sparkle-mahagaichi-tutari/

