अकोला: शेतमालाला योग्य हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या
अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले.
Related News
भूकंपाचा भीषण कहर! अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू लुकास ट्रेजोच्या पत्नीसह 2 मुलांचा पत्ता नाही
7 मनमोहक क्षण! मुंबईच्या आकाशात झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य, मरीन ड्राइव्हवर निसर्गाची अद्भुत जादू
IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर 10 भन्नाट Memes व्हायरल! श्रेयस अय्यरवर संतप्त चाहत्यांचा जोरदार निशाणा
24 जूनच्या वादळाने उडवले घराचे छप्पर; अकोल्यातील बाहेकर कुटुंब उघड्यावर
हुबेहूब रुपाली चाकणकरच… दीपाली सय्यदचा जबरदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल ; 5 फोटोत पाहा!
AI चा धक्कादायक गैरवापर! लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीचा छळ; 500 कॅब, बनावट हनीमून फोटो आणि डोहाळेजेवणाच्या आमंत्रणाने उडाली खळबळ
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!
7.5 रिश्टरच्या भूकंपानंतर व्हायरल झालेला वडिलांचा फोटो खरा की खोटा? जाणून घ्या 5 मोठी सत्ये
मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित हत्याकांड! 400 CCTV फुटेजमधून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस
मुंबई सोडून बेंगळुरूत करिअर! मराठी तरुणाने सांगितले 7 धक्कादायक अनुभव; पैसा मिळाला पण एकटेपणाची भीतीही वाढली
राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात मोठी घडामोड; 2 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
या आंदोलनात शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा त्वरित लागू करावा.
- सरसकट कर्जमुक्ती द्यावी.
- सोयाबीन – ₹6,000, हरभरा – ₹8,000, कापूस – ₹10,000, तूर – ₹12,000 प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा.
- स्वामिनाथन आयोग लागू करावा.
- पीक कर्जावर (CIBIL) अट लागू करू नये.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने करावा.
- रब्बी व खरीप हंगामासाठी प्रती एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरील जीएसटी (GST) रद्द करावी.
रात्रभर सुरू राहिले आंदोलन
हे आंदोलन रात्री १० वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कीर्तन व भजन गात आपला आवाज बुलंद केला.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सरकारला इशारा
या आंदोलनामुळे सरकारची झोप उडावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा,
हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/gold-and-silver-sparkle-mahagaichi-tutari/

